Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट; 48 तासात अवकाळीची शक्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट; 48 तासात अवकाळीची शक्यता

Surajya Digital
Last updated: 2020/11/20 at 11:05 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण थंडी कमी झाली आहे. आकाशातील ढगांमुळे काही गेल्या आठवड्यापर्यंत कोरड्या वातावरणात किंचित आर्द्रता आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. अशातच महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट पसरलं आहे. तर, मनमाड, चांदवड भागात पावसाने हजेरी लावली आहे.

येत्या 48 तासात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही परिसरात पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात दक्षिण-पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे तापमानात वारंवार वाढ होत आहे. यामुळे पुढील 48 तासांत याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टयात होणार आहे. त्यानंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरच्या सुमारास हा पट्टा ओमानच्या दिशेने पुढे सरकेल. या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीच्या प्रभावामुळे राज्यातील तापमनात वाढ झाली असून थंडीचा कडाका कमी झाले. त्यामुळे रोज अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये अजूनही नागरिकांनी गर्मीचा सामना करावा लागत आहे.

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून थंडी जाणवत होती. मध्यंतरी चंद्रपुरातील तापमान 8, तर शहरातील तापमान 13 अंशांच्या आसपास पोहोचले होते. मात्र, गेल्या आठवड्यात नीरभ्र आणि मोकळ्या आकाशात ढगांनी गर्दी केली आणि तापमानात अचानक वाढ झाली. पुढील काही दिवस हे ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

* पावसाच्या हाहाकाराची आठवण

राज्यात गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला होता. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक देखील या पावसानं हिरावून घेतलं होतं. कोरोना काळातील टाळेबंदीमुळे बिघडलेलं आर्थिक चक्र, बोगस बियाणं, कीड, अतिवृष्टी अशा संकटाचा सामना करत टिकवलेलं पीक देखील परतीच्या पावसामुळे शेतातील मातीसह वाहून गेल्यामुळे पुन्हा कसं उभं राहायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आता आणखी अवकाळी पावसाचं सावट पसरलं आहे.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #महाराष्ट्रावर #पुन्हाअवकाळी #पावसाचं #सावट #48तासात #अवकाळीचीशक्यता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लसीची खात्री नाही, पण कोरोना लस 500 रुपयात मिळणार
Next Article अजित पवारांच्या शेजा-याची आत्महत्या, नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची नावे

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?