Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी “यांची” घेतली होती भेट, स्वत:ला संपविण्याच्या प्रकरणाचे वाढले प्रचंड गूढ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी “यांची” घेतली होती भेट, स्वत:ला संपविण्याच्या प्रकरणाचे वाढले प्रचंड गूढ

admin
Last updated: 2025/04/20 at 2:40 PM
admin
Share
6 Min Read
SHARE

खास प्रतिनिधी
सोलापूर : प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकरांनी शुक्रवार (ता.18) आत्महत्येपूर्वी दुपारच्या सत्रात आपल्या वकिलाची भेट घेतली होती, असं कळतं. दरम्यान त्यांनी कोणत्या वकिलाची भेट घेतली होती, शिवाय भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली, यासंबंधीच्या माहितीचा तपशील मिळू शकला नाही. सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी वकिलासोबतच्या भेटीचा हा धागा पकडून चौकशी करु शकतात.डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येच्या संदर्भात प्रचंड गूढ वाढलं आहे. डॉक्टरांच्या तिसर्‍या दिवसाच्या विधीनंतर पोलीस त्यांच्या कुंटुंबातील सर्व सदस्यांसह रुग्णालयामधील संबंधित सर्व कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविणार आहेत.
डॉ. वळसंगकरांनी शुक्रवारी रात्री साठेआठ वाजण्याच्या सुमारास मोदी परिसरातील सोनामाता हायस्कूल जवळच्या त्यांच्या राहत्या घरी बेडरूमधील वॉशरूममध्ये पिस्तुलमधून स्वत:च्या डोक्यात दोन गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली, या घटनेची सर्वत्र मोठी चर्चा आहे, शिवाय मेंदू रुग्णांसाठी देवमाणूस असणार्‍या डॉक्टरांच्या जीवन संपविण्याच्या टोकाच्या निर्णयाबद्दल प्रचंड हळहळदेखील व्यक्त केली जात आहे.
मात्र या टप्यावर वैद्यकीय क्षेत्रासह सर्वांनी उत्सुकता आहे ती त्यांनी आत्महत्या का केली असावी? कुंटुंबातील सदस्यांसह संबंधित सर्वांचे जबाब आणि पोलीस तपास यातून त्यांच्या आत्महत्येचे गूढ समजेल.

देवमाणसाला साश्रुनयांनी अखेरचा निरोप,
अत्यंसंस्कारावेळी प्रत्येकजणाला हुंदका अनावर
सोलापूरसह, राज्य, देश अन् विदेशामधील रुग्णांचे अत्यंत गुतांगुतींचे मेंदू आजार बरे करुन त्यांना जीवदान देणारे जगविख्यात डॉ. शिरीष वळसंगकरांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी सोलापुरच्या मोदी स्मशानभूमीत अत्यंसंस्कार पार पडले.चिरंजीव डॉ. यांनी शेवटचे सोपस्कार केले. विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित त्यांचे कुंटुंबिय, नातेवाईक, मित्र परिवार, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी, रुग्ण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर अशा प्रत्येकाला हुंदका आवरला नाही.सर्वांच्या अश्रुंचा बांध फुटला. अत्यंत शोकाकूल वातावरणात डॉ.वळसंगकरांना अखेरचा निरोप देण्यात आला.

आक्रोशावेळीच्या ‘त्या’ शब्दांनी सर्वांचं काळीज झालं चर्र
मेंदू रुग्णांसाठी देवमाणूस ठरलेल्या डॉ. शिरीष वळसंगकरांनी काल शुक्रवारी रात्री स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. कुंटंबातील कलह आणि नैराश्य यातून त्यांनी स्वत:ला संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहितीचा बोलबाला आहे. रुग्णांना जीवदान देणारे डॉ.वळसंगकर हे स्वत:च्या जगण्यावर एवढे नाराज कसे झाले? त्यांनी थेट स्वत:ला संपविण्याचा भयानक निर्णय घेतलाच कसा? यासंबंधीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र त्यांचं कायमचं जाणं हे सगळ्यांनी शॉकिंग झालं. त्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. मोदी स्मशानभूमीत डॉ. वळसंगकरांच्या पार्थिवावर अत्यंस्काराचे सोपस्कार होताना त्यांच्या रुग्णातील अन्य डॉक्टर, अधिपरिचारिका, इतर स्टाफ तसेच नातेवाईक आणि मित्र परिवार यांना अश्रु अनावर झाले. त्यावेळी ‘डॉक्टरसाहेब, असं कसं केलं हो? का सोडून गेलात आम्हाला’ हे शब्द पुन्हा पुन्हा उच्चारले त्यावेळी उपस्थित सर्वांच्या काळजाला चर्र झालं.

हवाई सफरीच्या हौसेचे डॉ. वळसंगकर
चंदीगडला विमानाने जायचे चिरंजीवाच्या भेटीला
डॉ. शिरीष वळसंगकरांना विमान प्रवास म्हणजे हवाई सफरीची प्रचंड आवड होती, पर्यायानं हौस होती. चंडगड या ठिकाणी त्यांचे चिरंजीव डॉ. अश्‍विन हे वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेत होते. या दरम्यान डॉ. शिरीष वळसंगकर हे पत्नी डॉ. उमा यांना सोबत घेऊन साधारण 15 दिवसाला विमानाने डॉ. अश्‍विन यांना भेटायला जायचे. चिरंजीवाची भेट अन् तीदेखील त्यांच्या हवाई सफरीने, यातून ते मनस्वी आनंदी असायचे, असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं.

कोण म्हणतं, डॉक्टरांसारखी मंडळी अबोल राहतात?
डॉ. शिरीष वळसंगकर तर बोलले होते पाच ते सहा मित्रांशी
डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येचे गुढ कायम राहतानाच, त्यांनी नेमकी आत्महत्या कशासाठी केली, यावर आता सर्वच स्तरात चर्चा सुरु आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने व्यक्त होतोय. तथापि, बुध्दजीवी, त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर अशी मंडळी कोणाशी कामांशिवाय संवाद साधत नाहीत. अबोल राहतात. सुखादु:खाच्या गोष्टी शेअर करीत नाहीत. खास करुन दु:ख पचवात. होणार्‍या घुसमटीबद्दल, शारिरीक, मानसिक त्रासाबद्दल ते कोणाशी संवाद साधत नाहीत. कोणाजवळ मन मोकळे करीत नाहीत. त्यातून त्यांची ती घुसमट अधिक वाढत राहते. ते एकलकोंडे व्हायला लागतात, शिवाय ते नैराश्याच्या गर्तेत जातात, असा विचार अनेकांनी डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येनंतर मांडला. मात्र डॉ. वळसंगकरांच्याबाबतीत तो विचार खोडला जातो. कारण साधारण आठवडाभरापासून नैराश्याच्या आणि प्रचंड तणावाच्या मनस्थितीत असलेल्या डॉ. वळसंगकरांनी आपल्या जवळच्या पाच ते सहा मित्रांशी संवाद साधला होता. या संवादांमध्ये त्यांनी स्वत:च्या त्रासाबद्दल, नैराश्याबद्दल बोलून दाखवलं होतं, मनमोकळं केलं होतं, अशी चर्चा त्यांच्या मित्र परिवारामध्ये आहे.

सरसंघचालक मोहन भागवतांच्या
विमान चालविण्याचं सारथ्य केलं होतं डॉ. शिरीष सरांनी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे मागच्या दोन वर्षांपूर्वी विजापूर जिल्ह्यातील निंबाळी दौर्‍यावर आले होते. या दरम्यान ते सोलापुरात असताना त्यांना दिल्लीला एक विशेष बैंठकीसाठी तातडीने पोचण्याचा निरोप आला. त्यावेळी डॉ. शिरीष वळसंगकरांनी त्यांना स्वत:च्या विमानानं दिल्लीला सोडलं होतं.खास करुन बाब म्हणजे विमान चालविण्याचं सारथ्य डॉ. शिरीष सरांनी केलं होतं. त्यावेळी सरसंघचालक भागवत यांनी डॉक्टरांच्या पाठीवर थाप टाकून त्यांचे अभिनंदन करत त्यांचे आभारही मानले होते. हा त्यांच्याबाबतीमधील संस्मरणीय किस्सा आहे.

पोलीस आयुक्त म्हणाले,
सुसाईड नोट नाही, पण घटनेचा तपास सुरु
डॉ. वळसंगकरांच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर, सोलापूरचे पोलीस आयुक्त डॉ. एम.राजकुमार यांनी प्रसारमाध्यमांना शनिवार (ता.19) माहिती दिली. ते म्हणाले की, डॉ. वळसंगकरांनी त्यांच्या राहत्या घरी बेडरुमधील वॉशरुमध्ये स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. त्यांनी आत्महत्या का केली?या संदर्भात सुसाईड नोट सापडलेली नाही. आत्महत्येची नोंद सदर बझार पोलीस ठाण्यात झाली आहे. या पोलीस ठाण्याकडील चौकशी अधिकारी डॉ. वळसंगकर कुंटुंबातील सदस्यांनी चर्चा करुन पुढील कारवाई करतील, एकूणच घटनेच्या अनुषंगाने, तपास पोलीस करीत आहेत, असे आयुक्त म्हणाले.

You Might Also Like

राजकीय विश्लेषक राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर सीईओ जंगम यांनी शिक्षणाधिकार्यांवर चिडून सभागृह सोडले

भीमा नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

उजनी धरणाचा विसर्ग घटल्याने पंढरपूरमधील पुरधोका टाळता आला

सोलापूर जिल्ह्यात ४१५४ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी; “एक गाव-एक गणपती” चालना

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘उदे ग अंबे उदे’चा गजर टू ‘दम मारो दम’चा नशिला आवाज जीवघेण्या ड्रग्जची एन्ट्री ‘या’ शहरात झाली कशी? वाचा खास रिपोर्ट…
Next Article घामाचा धारा…प्रचाराचा वारा…सगळीच उठली तगमग कोठे घडतंय हे सगळं?

Latest News

सुप्रीम कोर्टाकडून ‘वनतारा’ प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश; माजी न्यायाधीशांची समिती
देश - विदेश August 26, 2025
इम्रान खान यांच्या पक्षाच्या ७५ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना न्यायालयाने सुनावली शिक्षा
देश - विदेश August 26, 2025
अमेरिकेत एच-१बी व्हिसा बंद होण्याची शक्यता; रिपब्लिकन सिनेटरचे विधान
Top News देश - विदेश August 26, 2025
aurangabad-gopinath-munde-farmer-accident-insurance-scheme-beneficiaries
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
महाराष्ट्र August 26, 2025
पित्याने केली मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या
Top News August 26, 2025
मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?