पाटणा, 18 जून (हिं.स.) : बिहारमध्ये गेल्या 24 तासात राज्याच्या 6 जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या बक्सरमध्ये 4, पश्चिम चंपारणमध्ये 3, कटिहारमध्ये 2, कैमूर, लखीसराय आणि सीतामढीमध्ये प्रत्येकी एक जण वीज कोसळून मृत्युमुखी पडला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनांबद्दल शोक व्यक्त केलाय.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या आपत्तीच्या काळात आपण पिडीत कुटुंबांसोबत आहोत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच नागरिकांनी खराब हवामानात अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. खराब हवामानात, विजांपासून बचाव करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ————————