नवी दिल्ली : कोरोना अजून संपत नाही तोच नव्या रोगाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. आता कुठे भारत कोरोनातून थोडा मोकळा श्वास घेत असताना नवे संकट आले आहे.
देशभरात आता बर्ड फ्लूनं थैमान घातलं आहे. आतापर्यंत तीन ते चार हजार पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. नव्या संकटाने पुन्हा एकदा देशाला हादरवून टाकले आहे. अनेक ठिकाणी मेलेल्या पक्ष्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. यावरुन हे संकट आहे बर्ड फ्लूचे आहे, हे आता स्पष्ट होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एकीकडे कोरोनाच्या लस देण्याची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे नवा रोग आक्रमण करायला दबा धरुन बसला आहे. देशभरात बर्डफ्लूचा कहर सुरू झाला आहे.
भारतातल्या 8 राज्यांमध्ये बर्ड फ्लूनं थैमान घातलं आहे. हिमाचल प्रदेश, केरळ, राजस्थान, हरियाणात बर्ड फ्लू पसरलाय. मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, गुजरातमध्येही बर्ड फ्लूनं पक्षी मेल्याचे वृत्त आहे. हिमाचल प्रदेशात अडीच हजार पक्ष्यांचा मृत्यू झालाय. मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये अडीचशे कावळ्यांचा मृत्यू झालाय. इंदूरमध्ये तीन दिवसांत ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.