लाहोर , 30 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढत चालला आहे. भारताने पाकिस्तान विरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने अनेक वेक अणुबॉम्बची धमकी दिली आहे.अशातच आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनीही अणुबॉम्बबाबत पोकळ धमकी दिली आहे. मरियम यांनी,” पाकिस्तानवर कोणीही हल्ला करू शकत नाही” असा दावा केला आहे.
मरियम नवाज यांनी, “आज भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव आहे. धोका निर्माण झाला आहे, पण काळजी करण्याची गरज नाही. अल्लाहने पाकिस्तानी सैन्याला इतकी शक्ती दिली आहे की ती शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याचा प्रतिकार करू शकते. मी तुम्हाला सांगते आज पाकिस्तानचा कोणताही शत्रू हल्ला करण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल. याचे कारण असे आहे की, अल्लाहच्या कृपेने, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे.” मरियम नवाज यांनी त्यांचे वडील आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे कौतुक केले. कारण त्यांनी,”पाकिस्तानला अणुशक्ती बनवण्यात नवाज शरीफ यांनी ऐतिहासिक भूमिका बजावली आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आणि सिंधू पाणी करार स्थगित केला. यासोबतच आणखी काही निर्णय घेण्यात आले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. आता पाकिस्तान भारताला अणुबॉम्बची धमकी देत आहे. तथापि, दरम्यानच्या काळात ते तुर्की आणि रशियासारख्या अनेक देशांमध्ये पोहोचले आहे. पाकिस्तानने रशियाला भारताला पटवून देण्याचे आवाहन केले होते.