Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रेल्वेत 2030 पर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

रेल्वेत 2030 पर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट

admin
Last updated: 2025/05/29 at 5:32 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.) : भारतीय रेल्वेच्या प्रत्येक प्रवाशाला आगामी 2030 अखेर कन्फर्म सीट उपलब्ध करून देण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. यासाठी रेल्वे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करत आहे. यामध्ये कोचनिर्मितीपासून ते नवीन मार्गांचा विस्तार यांचा समावेश आहे.

यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या 4-5 वर्षांत 500 हून अधिक रेल्वे कोच तयार केले जातील. तर 2030 पर्यंत 40 हजार किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग टाकण्याच्या दिशेने वेगाने काम सुरू आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे नेटवर्क विस्तार असेल. यातंर्गत, 434 उपप्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यावर सुमारे 11 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या विस्तारामुळे गाड्यांची संख्या वाढेल, ज्यामुळे प्रमुख मार्गांवरील भार कमी होईल आणि तिकिटांच्या वेटिंगची समस्या हळूहळू संपेल.

आगामी 5 वर्षांत 500 हून अधिक नवीन कोच तयार करणार आहे. हे डबे केवळ संख्येने जास्त नसून, तांत्रिकद़ृष्ट्या प्रगत आणि प्रवाशांसाठी अधिक आरामदायी असतील. याशिवाय, रेल्वेने 8 हजार ट्रेन सेट खरेदी करण्याची योजना आखली आहे. ज्यावर एक लाख कोटी रुपये खर्च केले जातील. रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (चेन्नई), मॉडर्न कोच फॅक्टरी (रायबरेली) आणि रेल कोच फॅक्टरी (कपूरथळा) या तीन प्रमुख कोच उत्पादन कारखान्यांमध्ये उत्पादन क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.त्याचप्रमाणे 2030 पर्यंत 200 वंदे भारत आणि एक हजार अमृत भारत गाड्या चालवण्याची रेल्वेची योजना आहे. या गाड्या केवळ हाय-स्पीड नसतील, तर त्यात जागतिक दर्जाच्या सुविधाही असतील. वंदे भारत गाड्या आधीच अनेक मार्गांवर प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देत आहेत. अमृत भारत गाड्या प्रामुख्याने पारंपरिक लांब पल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांची जागा घेतील.

भारतीय रेल्वे सध्या दरवर्षी 800 कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा देते आणि 2030 पर्यंत हा आकडा एक हजार कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी, रेल्वे तीन हजार अतिरिक्त गाड्या चालवण्याची योजना आखत आहे. यामुळे अधिक प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे.

You Might Also Like

खेळातून करिअर: कुंड सर्जापूरच्या ४० तरुणांना सरकारी नोकऱ्या

शैलेश जेजुरीकर पीॲंडजीचे पुढचे सीईओ

निवडणुकीसाठी मुदतवाढ मागणार : सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात अर्ज

चीनमध्ये अतिवृष्टीचा कहर: बीजिंगमध्ये ३४ मृत्यू, ८०,००० नागरिकांचे स्थलांतर

वादग्रस्त मंत्री, आमदारांविरोधात कारवाई करा; अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ – अंबादास दानवे यांचा इशारा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जम्मू-काश्मीर : लश्करच्या 2 दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण
Next Article अमेरिकन न्यायालयाने ‘लिबरेशन डे’ टॅरिफवर घातली बंदी

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?