Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोल्हापूरकरांनी निवडणुकीत उबाठाला कायमचे फेकून दिले; एकनाथ शिंदे यांची टीका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कोल्हापूरकरांनी निवडणुकीत उबाठाला कायमचे फेकून दिले; एकनाथ शिंदे यांची टीका

admin
Last updated: 2025/04/06 at 12:51 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

कोल्हापूर, 6 एप्रिल (हिं.स.)।

सत्तेसाठी इमान विकणाऱ्या, बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्या उबाठाला कोल्हापूरकरांनी विधानसभा निवडणुकीत कायमचे फेकून दिले, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आयोजित आभार सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने आणि शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, कोल्हापुरात महायुतीच्या १० पैकी १० जागा निवडून आल्या. कोल्हापूरकरांना १०० टक्के मार्क मिळाले. कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे. इथला कोणी नाद करायचा नाय आणि त्यांनी निवडणुकीत दाखवून दिले. पहिल्यांदाच राधानगरी भुदरगडला मंत्री मिळाला, पालकमंत्री मिळाला आणि आरोग्य खाते सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने आरोग्य आणि शिक्षण खाते शिवसेनेकडे मागून घेतल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४५० कोटींची गरजू रुग्णांना मदत केली तर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्याने अडीज वर्षात केवळ अडीच कोटी दिले होते. शासन आपल्या दारी उपक्रमातून पाच कोटी लोकांना लाभ मिळाला. मागील अडीच वर्ष केलेल्या अमर्याद कामाने जनतेने भरभरुन आशीर्वाद दिला. महाराष्ट्र नंबर एकवर नेऊन ठेवला आहे. या राज्यात विकासाच्या प्रचंड संधी आहेत, असे ते म्हणाले. अडीच वर्षात सरकारने शेतकऱ्यांना ४५००० कोटींची मदत केली. १५० सिंचन योजनांना मंजुरी दिली.

ते पुढे म्हणाले की, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर काय भूमिका घ्यायची यावर त्यांचा गोंधळ उडाला. काही लोकांचा चेहरा भोळा असतो पण भानगडी सोळा असतात, अशांना कोल्हापूरकरांनी निवडणुकीत तडीपार केले, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. काहींनी मला हलक्यात घेतले. मी शांत आहे, शांततेत काम करु द्या, पण मला कोणी छेडले तर मी सोडत नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. दाढीवर कितीही टीका केली तर याच दाढीने तुमची मग्रुरी जिरवली. दाढीने महाभकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली, हे विसरु नका, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जनतेच्या न्यायालयात जाऊ म्हणणाऱ्यांच्या १०० पैकी २० जागा निवडून आल्या, आम्ही ८० जागा लढून ६० आमदार निवडून आले. आम्ही उठाव करुन शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवला त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हमधून मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता, मात्र मतदारांनी विधानसभा निवडणुकीत हा डाव हाणून पाडला. महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. विरोधकांनी कितीही खोटनाटे पसरवले तरी राज्यात लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.ते पुढे म्हणाले की, सदगुरु संत बाळुमामा यांच्या तीर्थ क्षेत्रासाठी ६५० कोटींचा विकास आराखडा तयार होत आहे. कोल्हापूर संतांची, वारकऱ्यांची, धारकऱ्यांची भूमी आहे. इथल्या तीर्थक्षेत्रांचा, मंदिरांचा, गडकोट किल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. हे प्रगत राज्य आहे. देशातील सर्वाधिक पायाभूत सेवा प्रकल्प आकारास येत आहेत. महायुतीचा स्ट्राईक रेट इतका जबरदस्त होता की विरोधी पक्षांना तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. हा महाराष्ट्रातील जनतेने इतिहास घडवला आहे, असे ते म्हणाले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोपरीच्या चैत्र नवरात्रौत्सवात अवघी पंढरी अवतरली
Next Article प्रतिकूलतेचे खत करून बाबासाहेबांनी समतेच्या विचारांचे अमृतरोप फुलविले – प्रा. प्रवीण दवणे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?