Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित करू नये; आदिवासी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित करू नये; आदिवासी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

admin
Last updated: 2025/06/10 at 6:45 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 10 जून, (हिं.स.) मेळघाटमधील आदिवासी शेतक-यांना शेतीपासून वंचित करू नये, या एकमेव मागणीसाठी मेळघाटमधील आदिवासी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले होते.

मेळघाटमधील धरमडोह या गावातील आदिवासी शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. मागील अनेक वर्षापासून त्यांनी शासकीय पडीत जमीन कसून ती वाहितीस घेतली. ती जमीन वनविभागाची आहे की महसूल विभागाची, यावर काहीवर्ष वाद सुरू होता. नंतर मात्र वन विभागाने सदर जमिनीला कुंपण घालून शेतकऱ्यांना जमीन पेरणी करू नये, असे पत्र दिले. त्यामुळे धर्म या गावातील नागरिकांना भूमिहीन होण्याची भीती वाटतआहे.

उदरनिर्वाहाचे कुठलेच साधन नसल्याने त्यांचे कुटुंब या शेतीवरत्त अवलंबून आहे. ही शेती जर हातची निघून गेली. तर आत्महत्या करण्याशिवाय कुठलाही पर्याय या शेतकऱ्यांकडे शिल्लक राहणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याकडे पाच एकर शेती आहे. ती शेती मागील ४० वर्षापासून त्यांचे कुटुंब कसून उदरनिर्वाह चालवत आहे.त्यामुळे त्यांना शेतीपासून वंचित करू नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदन देतेवेळी नागो बेठेकर, शित्या बेठेकर, ओमप्रकाश आखंडे, सुंदरलाल आखंडे, गिता धिकार, नामज अखंडे, माधुरी बेठेकर, दिनेश बेठेकर, छोटेलाल बेठेकर, बबलू कास्देकर, सतीश धिकार, छबुलाल धिकार, मुत्री धिकार, सुनीता धिकार, बाबूलाल कास्टेकर, भाऊलाल सावलकर, रवींद्र जामुनकर, प्रकाश जामुनकर, रवी जामुनकर, सुनील धोत्रे, प्रेमलाल धोत्रे, अंकित धिकार यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते.

सहायक वनसंरक्षक वनविभाग परतवाडा यांची २८ मे २०२५ ची नोटीस तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अंजनगाव यांचे पत्र व १ वर्षापूर्वी जिल्हाधिकारी आणि सहायक उपवनसंरक्षक मेळघाट यांनी दिलेले आश्वासन यांचा विचार करून शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित करूनये, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
Next Article ना हिरवा, ना भगवा; पहिले शेतकरी जगवा – सत्यपाल महाराज

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?