● निर्बंधमुक्त होळी, धुळवड साजरी करण्याचा मार्ग मोकळा
मुंबई : होळी आणि धुळवडीवर घालण्यात आलेले निर्बंध ठाकरे सरकारने मागे घेतले आहेत. राज्य सरकारने होळी रात्री 10 च्या आत पेटवण्यासह इतरही बंधन घातले होते. यानंतर हिंदुंच्याच कोणत्याही सणांवर बंधने का? असा सवाल करुन महाविकास आघाडीवर नागरिकांची टीका होऊ लागली होती. यानंतर राज्य सरकारने अखेर हे निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे यंदा निर्बंधमुक्त होळी, धुळवड साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुळवडीवर घालण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. गृह विभागाने करोनाच्या नियमांचं पालन करावं तसंच कमीत कमी गर्दी करुन होळी सण साजरा करावा असं आवाहन केले होते. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली होती.
गृह विभागाने करोनाच्या नियमांचं पालन करावे तसेच कमीत कमी गर्दी करुन होळी सण साजरा करावा, असे आवाहन केले आहे. रंग लावणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. Thackeray government lifts ban on Holi and Dhulwadi
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शिमगा साजरा करत असताना पालखीची मिरवणूक घरोघरी न नेता मंदिरात नेली जावी, अशी सूचना देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वेळेचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. नियमात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरणही गृह विभागाने दिले आहे.
यावर विरोधकांसह सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने अखेर हे निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे यंदा निर्बंधमुक्त होळी, धुळवड साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेचं बंधन काढून टाकण्यात आलं आहे. नियमात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचं स्पष्टीकरणही गृह विभागाने दिलं आहे.
भाजपा आमदार राम कदम यांनी या निर्बंधांवरुन संताप व्यक्त केला होता. महाराष्ट्र सरकारचा हिंदू सणांना इतका टोकाचा विरोध का? अशी विचारणा त्यांनी केली होती. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच असा इशाराही यावेळी त्यांनी दिली होता. दरम्यान सरकारने निर्बंध मागे घेतल्यानंतर त्यांनी स्वागत केलं असून इतक्या उशीरा शहाणपण सुचलं असा टोलाही लगावला आहे.
#महाराष्ट्रसरकारचा एवढा टोकाचा #हिन्दू सणांना विरोध का ? आता पुन्हा त्यांनी #होळी आणी #रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत .. आहो तुम्ही घाबरट असाल .. हा #शिवरायांचा महाराष्ट्र आहे.. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात..
— Ram Kadam (@ramkadam) March 17, 2022