Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार – विंग कमांडर व्योमिका सिंह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार – विंग कमांडर व्योमिका सिंह

admin
Last updated: 2025/05/07 at 4:35 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 7 मे (हिं.स.)।’ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतीय सशस्त्र दल आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेत या मिशनची संपूर्ण माहिती दिली.यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा देखील दिला आहे.

या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, “आमच्या गुप्तचर यंत्रणेने भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात असे संकेत दिले आहेत. या कारवायांना वेळीच रोखणं आणि त्यांचा प्रतिकार करणं अतिशय आवश्यक आहे. आज सकाळी भारताने अशा सीमापार हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा आणि रोखण्याचा आपला अधिकार वापरला आहे. ही कृती अत्यंत विचारपूर्वक, कुणालाही चिथावणी न देणारी, प्रमाणबद्ध आणि जबाबदार आहे. दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यावर आणि भारताच्या मार्गावर असलेल्या संभाव्य आतंकवाद्यांना निष्क्रिय करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.”

दरम्यान, पत्रकार परिषदेच्या शेवटी विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आणि म्हटले की, “आम्ही पाकिस्तानकडून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रियेला तोंड देण्यास तयार आहोत. जर, भविष्यात पाकिस्तानने कोणतीही चिथावणीखोर कारवाई केली, तर भारतीय सैन्य त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.”

भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, “७ मे २०२५ रोजी रात्री १.०५ ते १.३० दरम्यान, भारतीय सशस्त्र दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली जाईल. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सुरू करण्यात आले. या कारवाईत नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ती तळे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली. गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. त्यांना आता थांबवणे आवश्यक आहे.”

—————

You Might Also Like

इराणचे नेते खामेनेई यांचे सल्लागार जवाद लारीजानी यांची ट्रम्प यांना उघडपणे धमकी

अमेरिकेने लादलेल्या ५० टक्‍के ‘टॅरिफ’वर ब्राझीलच्या राष्ट्रध्यक्षांनी ट्रम्प यांना दिले आव्हान

गुरूपौर्णिमा : तीर्थस्थळी भाविकांची अलोट गर्दी

दिल्लीत 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप

इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक गोल्डमन सॅक्समध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून सामील होणार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही’ – राज ठाकरे
Next Article हे धर्माविरुद्ध नाही तर दहशतवादा विरोधात युद्ध – भुजबळ

Latest News

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू
Top News July 10, 2025
मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू
Top News July 10, 2025
ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर
Top News July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?