Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कंगनाच्या बंगल्याच्या कारवाईप्रकरणी हायकोर्टाने महापालिकेला फटकारले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुडमहाराष्ट्र

कंगनाच्या बंगल्याच्या कारवाईप्रकरणी हायकोर्टाने महापालिकेला फटकारले

Surajya Digital
Last updated: 2020/09/25 at 10:34 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या बंगल्यावरील कारवाईच्या प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाने महापालिकेला फटकारले आहे. मुंबई पालिकेचे अधिकारी भाग्यवंत लाटे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागितली होती. यावरून न्यायालयाने मुंबई महापालिकेला सुनावलं होतं. यावर कंगनानं ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागणाऱ्या भाग्यवंत लाटे यांच्या वकिलांना न्यायालयानं फटकावरलं होतं. इतर वेळी तुम्ही तत्पर असता आणि जेव्हा उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा मुदत मागता, असं कोर्टानं म्हटलं होतं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यावर कंगनानं न्यायालयाचे आभार मानले आहेत. ‘तुमचा हा निर्णय ऐकून मला गहिवरून आलं. मुंबईच्या या मुसळधार पावसात माझं घर कोसळतंय, पण तुम्ही माझ्या घराचा विचार केला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, अशा शब्दात कंगनानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई महापालिकेनं कंगनाच्या बंगल्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचं म्हणत नुकसानभरपाईसाठी कंगनानं न्यायालयात धाव घेतली होती. तसंच, संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळं बंगल्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोपही तिनं केला होती. कंगनाच्या या आरोपांनंतर न्यायालयानं संजय राऊतांनी या प्रकरणात प्रतिवादी केलं होतं. त्याचबरोबर तोडकामाची कारवाई करणारे सहाय्यक आयुक्त लाटे यांनाही प्रतिवादी केलं आहे. त्यांच्याकडून न्यायालयाने स्पष्टीकरण मागवलं होतं.

* भिवंडीत दुर्घटनेवरुन कंगनाचा निशाणा

कंगनानं पाकिस्ताननं पुलवामामध्ये केलेल्या हल्ल्यात जितके जवान शहीद झाले त्यापेक्षा कित्येक निष्पाप नागरिकांचा तुमच्या बेफिकीरीमुळं मृत्यू झालाय, असा धक्कादायक आरोप केला आहे. भिवंडीत दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या वरूनच कंगनानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #कंगना #मुंबई #हायकोर्ट #महापालिका #फटकारले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रवादीतून एमआयएममध्ये गेलेल्या नेत्याच्या बंगल्यावर छापा; खालिद गुड्डूसह सातजण ताब्यात
Next Article ‘शेतक-यांनंतर कामगारांवर वार, गरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण’

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?