Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारतातील प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक – बाळासाहेब थोरात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

भारतातील प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक – बाळासाहेब थोरात

admin
Last updated: 2025/05/01 at 6:14 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अहिल्यानगर दि. 1 मे (हिं.स.) :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतेच्या व बंधुभावाच्या विचारांवर काम करणारा महाराष्ट्र हा विकासात देशात अग्रगण्य आहे. मानवता धर्माचा विचार देणाऱ्या महाराष्ट्राचा देशाच्या विकासात मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शेतकी संघ यशोधन कार्यालय येथे थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इंद्रजीत थोरात, डॉ जयश्री थोरात यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना थोरात म्हणाले की, भारतामध्ये विविधता आहे. विविध जाती जमाती समाज हा भारतीय या नावाखाली एकत्र आनंदाने राहतो आहे. लोकशाही व राज्यघटना ही आपली ताकद आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये अनेकांनी हुतात्मे पत्करले. एक मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची घडी बसवली. शेती, सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास ,साहित्य, कला, संस्कृती, औद्योगीकरण, जलसंधारण, विविध पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने मोठी प्रगती केली. आर्थिक समृद्धता निर्माण केली. त्यामुळे देशाच्या प्रगतीमध्ये कायम महाराष्ट्राचा वाटा मोठा राहिला आहे.महाराष्ट्र दिनाबरोबर आज कामगार दिन ही सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये कायम कामगार व कष्टकरी बंधूंचा मोठा वाटा राहिला आहे. सध्या मात्र जातीभेदाच्या नावावर होणारे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी असून समतेचा व मानवतेचा महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन त्यांनी केले.अमृत उद्योग समूहातही थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी कॉलेज सह्याद्री शिक्षण संस्था यांसह संगमनेर तालुक्यातील विविध गावे व विविध संस्थांमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

You Might Also Like

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिंधुदुर्ग जिल्हा ठरला राज्यातील व देशातील पहिला “एआय” प्रणाली वापरणारा जिल्हा
Next Article पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचा पंतप्रधान मोदींना संदेश

Latest News

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन
महाराष्ट्र October 18, 2025
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला
महाराष्ट्र October 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?