Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

admin
Last updated: 2025/05/28 at 4:38 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, २७ मे (हिं.स.) : राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून हवामान विभागाने पुढील ६ ते ७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रेड अलर्ट, तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच केरळ, कर्नाटक आणि गोव्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत कालपासून रिमझिम पावसाची नोंद झाली असून समुद्रात चार ते पाच मीटर उंच लाटा उसळल्याचं पाहायला मिळालं आहे. आज सकाळपासून ओहोटीमुळे समुद्राचे पाणी मागे सरकलं आहे.

दरम्यान, जळगावमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून फळबागांचे नुकसान आणि मशागतीचे काम लांबणीवर पडले आहे. गोंदिया जिल्ह्यातही मान्सूनची दमदार हजेरी लागली आहे.

रत्नागिरीत पावसामुळे प्रमुख नद्या पाणीदार झाल्या असून टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे विहिरी व तलाव भरले असून टँकरवरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे.

जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ४७ गावांना पुराचा धोका असून आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांना ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आणि आपत्कालीन टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मे महिन्यात पूर्वमोसमी पावसामुळे राज्यात तब्बल २५४ झाडे कोसळली असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या विकासकामांमुळे झाडांची मुळे कमकुवत होऊन हे प्रकार घडल्याची चर्चा आहे.

You Might Also Like

खेळातून करिअर: कुंड सर्जापूरच्या ४० तरुणांना सरकारी नोकऱ्या

शैलेश जेजुरीकर पीॲंडजीचे पुढचे सीईओ

निवडणुकीसाठी मुदतवाढ मागणार : सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात अर्ज

चीनमध्ये अतिवृष्टीचा कहर: बीजिंगमध्ये ३४ मृत्यू, ८०,००० नागरिकांचे स्थलांतर

वादग्रस्त मंत्री, आमदारांविरोधात कारवाई करा; अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ – अंबादास दानवे यांचा इशारा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिकेत शिक्षणासाठी विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी
Next Article सावरकर एक अलौकिक प्रतिभावान पुरुष – महंत सुधीर दास

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?