Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हकालपट्टीच्या खोट्या बातमीनंतर ठाकरेंचा आढळरावांना फोन, आढळरावांनी दिला सूचक इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

हकालपट्टीच्या खोट्या बातमीनंतर ठाकरेंचा आढळरावांना फोन, आढळरावांनी दिला सूचक इशारा

Surajya Digital
Last updated: 2022/07/03 at 7:21 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : शिवसेनेतून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची हक्कालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त सामनामधून प्रसिध्द झाले होते. त्यानंतर शिवसेनेने प्रसिद्धीपत्रक काढून ही बातमी अनावधानाने छापली असल्याचा खुलासा केला. आता उध्दव ठाकरेंनी या सर्व प्रकारानंतर आढळराव पाटलांना फोन केला. तसेच झाल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली. पण “राज्यभर माझी बदनामी झाली त्याचं काय?” अशी प्रतिक्रिया आढळराव यांनी दिली. Uddhav Thackeray calls Adhalrao after false news of expulsion, Shivajirao Adhalrao gives warning

 

आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामन्यातून शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आणि राज्यात एकच खळबळ माजली आहे. शिवसेनेने प्रसिद्धीपत्रक काढून ही बातमी अनावधानाने छापली असल्याचा खुलासा केला आहे. त्यांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या या कारणावरून त्यांना काढून टाकल्याची माहिती होती. या घटनेनंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती.

 

या सर्व प्रकारानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना फोन करून झाल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

 

याबाबत शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि झाल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली आहे पण राज्यभर माझी बदनामी झाली त्याचं काय?” अशी सावध प्रतिक्रिया आढळराव यांनी दिली आहे. दरम्यान आज दिवसभर मी विचार करणार आहे. झाल्या प्रकाराबद्दल उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय ठरवला जाईल अशा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

म्हणाले की, आज सकाळपासून अनेकांचे फोन आले. सामना पेपर आणि न्यूज चॅनेलवर बातम्या पाहिल्या, त्या खऱ्या आहेत का? मला आधी वाटलं कोणीतरी माझी चेष्टा करतंय. मात्र, मी स्वतः सामना पेपर वाचला आणि मलाच धक्का बसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज राष्ट्रवादीच्या विरोधात बोलत आहेत. मी कित्येक वर्षे राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरूद्ध लढलो. गेल्या अडीच वर्षापासून मी त्यांना अंगावर घेत आलोय आता फक्त गोळ्या मारायच्याच बाकी आहेत.

शरद पवारांनी मला लोकसभा न लढण्यासाठी ऑफर दिली होती पण मी बाळासाहेबांच्या विचारावर ठाम राहिलो. आज माझी काही चुकी नसताना काही कारण नसताना मला पक्षातून काढून टाकण्यात आलंय. यासाठी काहीतरी कारण तरी द्यायचं.

 

 

पक्षातून हकालपट्टी झाल्यापासून मला कोणत्याही पक्षाचा फोन आलेला नाही. शिवसेनेत आल्यापासून मी भाजपमध्ये जाणार, राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा आहे. पण, त्यात आत्तापर्यंत तथ्य नव्हतं, यापुढे ही नसेल, असे सांगून त्यांनी आपण शिवसेनेतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

 

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #UddhavThackeray #calls #Adhalrao #false #news #expulsion #ShivajiraoAdhalrao #warning, #हकालपट्टी #खोट्या #बातमी #ठाकरे #आढळराव #फोन #राजकारण #सूचक #इशारा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह प्रणिती शिंदे, बबनराव शिंदे अधिवेशनास गैरहजर
Next Article नुपूर शर्मा पोस्ट समर्थनार्थ प्रकरणात झालेल्या हत्येत धक्कादायक खुलासा, आत्तापर्यंत सातजणांना अटक

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?