अमरावती, 28 मे (हिं.स.)
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क (आरटीई) कायदा लागू असताना शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी न त्यांना शाळेत प्रवेश देण्याची उद्देशाने कार्यवाही करण्यात येते. या उद्देशाने दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगार बसाहती अशा ठिकाणी शिक्षकांकडून ६ ते ८ ती क्योगटातील मुलांचे सर्वेक्षण केले जाते. यंदा मात्र एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरू असल्याने तसेच मे महिना त संपत आला असताना, शालाबाह्य जी मुलांचे सर्वेक्षण कधी होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील दोन-तीन वर्षांपूर्वी कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्या काळात स्थलांतराचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे शाळेत प्रत्यक्ष दाखल झालेली मुले यांचा शोध घेण्याची मोठी धावपळ करावी लागली होती.
यंदाही शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या मर्यादित असल्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू होत्या. सर्वसाधारणपणे शासनाकडून एप्रिल ते मे या कालावधीत शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले जातात. त्यानुसार उन्हाळ्यात सर्वेक्षण पूर्ण करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस या मुलांना त्यांच्या परिसरातील शाळांमध्ये दाखल करण्यात येते. शिक्षण विभागामार्फत लोकवस्तीतील, भटक्या बांधकाम प्रकल्पावरील मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो.
शाळाबाह्य मुले कुठली? शहरात बाहेर जिल्ह्यातील कुटुंब विविध व्यवसायाच्या निमिताने स्थलांतर करीत असतात. हे कुटुंबीय आर्थिक स्तर निम्न असलेल्या वंचित घटकात असतात. या स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणात या खंड पडण्याची समस्या निर्माण होते.