मुंबई, 23 जून (हिं.स.) – राष्ट्रीय एकता, अखंडता आणि देशाभिमान यासाठी अथक संघर्ष करणारे श्रद्धेय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी. “एक देश में दो निशान, दो प्रधान, दो विधान नहीं चलेंगे।” असं म्हणत डॉ. मुखर्जी यांनी कलम ३७० च्या विरोधात प्रत्येक देशभक्त मनात क्रांतीचे स्फुलिंग चेतवले. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. रविंद्र चव्हाण यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केले.
ते पुढे म्हणाले की, डॉ. मुखर्जी यांचे चरित्र आणि त्यांनी मांडलेले राष्ट्रहिताचे तत्त्वज्ञान आजही प्रत्येक देशभक्त मनात दिव्याची ज्योत होऊन उजळत आहे. भारतीय जनसंघाचे संस्थापक, आमचे प्रेरणास्थान श्रद्धेय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांस बलिदान दिनी कोटी कोटी वंदन.