Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राहुल गांधींची पंतप्रधानांवर विखारी टीका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

राहुल गांधींची पंतप्रधानांवर विखारी टीका

admin
Last updated: 2025/05/23 at 3:30 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 23 मे (हिं.स.)पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार राजस्थानच्या बिकानेर येथे भेट दिली यावेळी झालेल्या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना 3 प्रश्न विचारलेत. तसेच पंतप्रधानांचे रक्त केवळ कॅमेऱ्यासमोरच उसळते अशा शब्दात त्यांनी मोदींवर विखारी टीका केली.

यासंदर्भातील ट्विटर संदेशात राहुल गांधी म्हणाले की, “मोदींनी दहशतवादाबाबत पाकिस्तानवर विश्वास का ठेवला?, डोनाल्ड ट्रम्पसमोर नतमस्तक होऊन भारताच्या हितांचा त्याग का केला? मोदींचे रक्त फक्त कॅमेऱ्यासमोरच का उसळते”, अशा शब्दांत राहुल गांधींनी संताप व्यक्त केला आहे. याशिवाय, मोदींनी भारताच्या सन्मानाशी तडजोड केल्याचा आरोपही राहुल यांनी केलाय. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी बिकानेरमध्ये सांगितले होते की, पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या गेल्या, पण त्या गोळ्यांनी १४० कोटी देशवासीयांच्या हृदयाला छेद दिला. देशातील प्रत्येक नागरिकाने एकजुटीने संकल्प केला होता की दहशतवाद्यांचा नायनाट केला जाईल.

आमच्या बहिणींच्या केसांच्या विदाईतील सिंदूर नष्ट झाला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या सैन्याने असा चक्रव्यूह निर्माण केला की पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली. २२ तारखेला पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, २२ मिनिटांत ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. आपण सर्वांनी दहशतवाद्यांचा बदला घेण्याच्या आपल्या प्रतिज्ञेचे पालन केले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूपच वाढला. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताने आपल्या संरक्षण प्रणाली आकाशतीरने पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडला. मात्र, त्यानंतर देशाच्या राजकारणात ठिणगी पडली असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article युक्रेनने केला ड्रोन हल्ला, मॉस्कोत भारतीय खासदारांच्या विमान लँडिंगला लागला विलंब
Next Article पहलगाम दहशतवादी हल्ल्याला महिना पूर्ण; दहशतवाद्यांचा शोध सुरुच

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?