Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडदेश - विदेश

प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2020/09/25 at 2:55 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

चेन्नई : प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (वय 74) यांचे आज (शुक्रवार) निधन झाले आहे. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी करोनावर मात केली होती. मात्र, त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे बॉलिवडूवर शोककळा पसरली असून, अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटले जाते. त्यांनी जवळपास ४० हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे. अभिनेता सलमान खानसाठी ‘तुमसे मिलने की तमन्ना है’, ‘पहला पहला प्यार है’, ‘दिल दीवाना’ आणि ‘साथिया तू ने ये क्या किया’ यांसारखी अनेक गाणी गायली होती.

दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते की, ‘गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाही. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला.’

प्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रमण्यम यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सलमान खानचा आवाज म्हणून एस पी बालसुब्रमण्यम यांना ओळखले जायचे. सलमान खानच्या चित्रपटातील ‘तुमसे मिलने की तमन्ना है’, ‘पहला पहला प्यार है’, ‘दिल दीवाना’ आणि ‘साथिया तू ने ये क्या किया’ यासारखी अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी गायली होती.

४ जून १९४६ रोजी आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेले बालसुब्रमण्यम यांना सहा वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने आणि आंध्र प्रदेश सरकारकडून २५ वेळा तेलुगु चित्रपटांतील योगदानासाठी नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #एसपी #बालसुब्रम्हमणम #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘शेतक-यांनंतर कामगारांवर वार, गरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण’
Next Article कृषी सुधारणा आणि कामगार विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार नाही : उपमुख्यमंत्री

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?