Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “भारत काय करू शकतो हे जगाने पाहिले” – पंतप्रधान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

“भारत काय करू शकतो हे जगाने पाहिले” – पंतप्रधान

admin
Last updated: 2025/05/29 at 5:39 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.) : पहलगाम हल्ला आमच्या बंधूभावावर आणि मानवतेवर आक्रमण होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले. आम्ही काय करू शकतो हे जगाने पाहिल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सिक्कीमच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना ते बोलत होते.

पंतप्रधानांना खराब हवामानामुळे सिक्कीम दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे त्यांनी बागडोगरा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिक्कीमच्या लोकांना संबोधित केले.

यावेळी सिक्कीमच्या 50 व्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. सिक्कीममधील तुम्ही सर्वजण पर्यटनाची शक्ती चांगल्या प्रकारे जाणता आणि समजता. पर्यटन हे केवळ मनोरंजन नाही, ते विविधतेचा उत्सव आहे, परंतु दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये जे केले ते केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता. तो मानवतेच्या आत्म्यावर हल्ला होता, बंधुत्वाच्या भावनेवर हल्ला होता असे मोदींनी सांगितले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी आमच्या अनेक कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला. त्यांनी आम्हा भारतीयांना फूट पाडण्याचेही कट रचला. आज संपूर्ण जग पाहत आहे की भारत पूर्वीपेक्षा अधिक एकजूट झाला आहे. आम्ही एकत्र येऊन दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना स्पष्ट संदेश दिला. ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे आम्ही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याने निराश झालेल्या पाकिस्तानने आमच्या नागरिकांवर आणि सैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातही पाकिस्तानचे रहस्य उघड झाले. आम्ही त्यांचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले आणि भारत काय करू शकतो आणि केव्हा करू शकतो हे दाखवून दिले. ते किती वेगाने करू शकते, किती अचूकपणे करू शकते असे पंतप्रधानांनी सांगितले.

याप्रसंगी मोदी म्हणाले की, गेल्या 50 वर्षांत, सिक्कीम हे निसर्गाच्या सान्निध्यात प्रगतीचे एक मॉडेल बनले. ते जैवविविधतेचे एक मोठे उद्यान बनले. ते 100 टक्के सेंद्रिय राज्य बनले. ते संस्कृती आणि वारशाच्या समृद्धीचे प्रतीक म्हणून उदयास आले. गेल्या दशकात, आमच्या सरकारने ईशान्येला विकासाच्या केंद्रस्थानी आणले आहे. आम्ही ‘अ‍ॅक्ट फास्ट’ या विचाराने ‘अ‍ॅक्ट ईस्ट’च्या संकल्पावर काम करत आहोत. यावेळी सिक्कीमच्या विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे पायाभरणी आणि उद्घाटन येथे झाले आहे. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. सिक्कीमसह संपूर्ण ईशान्य नवीन भारताच्या विकास कथेत एक चमकदार अध्याय बनत आहे. जिथे एकेकाळी दिल्लीपासूनचे अंतर विकासाच्या मार्गात अडथळे होते, आता तेथून विकासाचे नवी दालने उघडत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथील कनेक्टिव्हिटीमध्ये झालेला बदल. तुम्ही सर्वांनी हा बदल स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे. येथे निसर्ग आहे, अध्यात्म आहे, शांततेच्या छायेत वसलेले तलाव, धबधबे आणि बौद्ध मठ आहेत. येथे कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान, युनेस्को जागतिक वारसा स्थळ देखील आहे. केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला सिक्कीमच्या वारशाचा अभिमान आहे. आज जेव्हा येथे एक नवीन स्कायवॉक बांधला जात आहे, सुवर्ण महोत्सवी प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे, अटलजींच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. हे सर्व प्रकल्प सिक्कीमच्या नवीन उड्डाणाचे प्रतीक असल्याचे मोदींनी नमूद केले.

You Might Also Like

शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय

भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरू

नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करा – खा. भागवत कराड

देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये ४४ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

कुलगाममध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिकन न्यायालयाने ‘लिबरेशन डे’ टॅरिफवर घातली बंदी
Next Article पोर्टलवर नोंदणी नाही केली तर अकरावीचे अॅडमिशन अडणार !

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?