Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात तर तीन माकडांचे सरकार- बच्चू कडू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

राज्यात तर तीन माकडांचे सरकार- बच्चू कडू

admin
Last updated: 2025/05/07 at 4:17 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 7 मे (हिं.स.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक सभेत शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन दिले होते. चार महिने झाले, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांना कानच राहिलेले नाहीत. त्या तीन माकडांसारखी अवस्था झाली आहे. एकाच्या तोंडावर बोट आहे, एकाच्या डोळ्यावर बोट आहे. एकाच्या कानावर हात आहेत. आता कुणाला सांगावे. कोणता भोंगा वाजवावा. ज्यामुळे या तीन माकडांचे तोंड उघडेल, अशी खरमरीत टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी केली.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित संताजी धनाजी पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. बच्चू कडू म्हणाले, तामिळनाडू सरकारचा अर्थसंकल्प ३ लाख कोटींचा आहे. बच्चू कडू म्हणाले, एकीकडे गडगंज संपत्तीचे प्रदर्शन करणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आजूबाजूला दिसतात. रेस्टॉरंट, बिअर बारमध्ये हे कार्यकर्ते बसतात. विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. पण, अशा विपरित परिस्थितीतही आम्ही आमच्या शेतकरी बापाची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरलो आहोत. ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. छातीवर दगड ठेवावा लागेल. किती इंचाची छाती आहे, हे माहित नाही.

पण त्या ५६ इंचाच्या छातीपेक्षा दहा पट मजबूत ही कार्यकर्त्यांची छाती आहे, हे आम्हाला माहीत आहे. बच्चू कडू म्हणाले, शेतकरयांवर अन्याय होत असताना, ते आत्महत्या करीत असताना कुणाला राग येत नाही. राग येण्याची प्रक्रियाच थांबली आहे की काय, असा प्रश्न आम्हाला पडतो. आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. हक्काची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. आधी काँग्रेसची राजवट होती, आता भाजपची आहे. २०२२ पर्यंत नरेंद्र मोदी सर्वांना घर देणार होते, त्याचे काय झाले, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानची भारताला धमकी
Next Article भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ दुर्दैवी- चीन

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?