Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई- गोवा महामार्गांवर कर्नाळा खिंडीमध्ये बस उलटून तिघांचा मृत्यू, अनेकजण जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मुंबई- गोवा महामार्गांवर कर्नाळा खिंडीमध्ये बस उलटून तिघांचा मृत्यू, अनेकजण जखमी

admin
Last updated: 2025/05/05 at 4:52 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 5 मे (हिं.स.)।मुंबई – गोवा महामार्गांवर कर्नाळा खिंडी येथे पनवेलहून रायगडला जाणारी एक खाजगी बस पलटी होऊन भीषण अपघात घडला आहे.ही घटना रविवारी(दि.४) रात्री अकराच्या सुमारास घडली.या घटनेत १९ प्रवासी जखमी झाले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.४) रात्री अकराच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गांवर कर्नाळा खिंड येथे पनवेलवरून रायगडच्या दिशेला जाणाऱ्या मार्गीकेवर क्रमांक एमएच ४७ वाय ७४८७ ही खाजगी बस वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन अपघात घडला.या बसमध्ये ३५ पेक्षा अधिक प्रवासी होते. यातील तीन जणांचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये अमोल तलवलेकर (वय अंदाजे ३०-३२ वर्षे)असे मृत्यू झालेल्या एकाचे नावं आहे. तर एका लहान मुलीचा पाय पत्र्याने कापला गेला असून तिच्यावर एमजीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे.इतर जखमींना पनवेलमधील एमजीएम व गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले.

अपघात स्थळी पनवेल महानगरपालिका व कळंबोली फायर यांचे रेस्क्यू टीम ॲम्बुलन्स व क्रेन घटनास्थळी पोचले होते.सदर अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती.यावेळी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सोडवली. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कर्नाळा खिंडीत वारंवार अपघात होत असतात.नागमोडी वळणावर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना अर्धवट ठरत आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा – मुख्यमंत्री
Next Article महापर्यटन उत्सवात मुख्यमंत्र्यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?