Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फसवणूक टाळण्यासाठी ‘साथी’ ऑनलाइन नोंदणीनंतरच आता विकता येणार बियाणे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

फसवणूक टाळण्यासाठी ‘साथी’ ऑनलाइन नोंदणीनंतरच आता विकता येणार बियाणे

admin
Last updated: 2025/05/20 at 6:21 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 20 मे (हिं.स.)

शेतकऱ्यांची अनेकदा बियाणे खरेदीतून फसवणूक होते. बियाणे उगवून न आल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात. त्यामुळे त्यांची फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होते. ते टाळण्यासाठी बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीस प्रतिबंध घालण्यात येऊन बियाणे विक्रीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाकडून देण्यात येणारे सत्यप्रत बियाणे आता साथी पोर्टलवर नोंदणी करूनच दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळून ते चढ्या दराने विकता येणार नाही आणि बोगसगिरीही करता येणार नसून गैरप्रकारांना चाप बसणार आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना त्यांची फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विभागाकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याद्वारे नियंत्रण आणण्यात यशही आले आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी बियाणे बोगस लागल्याच्या तक्रारी दाखल होत आहेत. त्याचा विचार करून कृषी विभागाने आता शेतकऱ्यांच्या बियाण्यांच्या बाबतीत तक्रारीच येऊ नये, त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी स्वतंत्र प्रणाली कार्यान्वित केली आहे.

बियाणे कंपन्यांसाठी बंधन

कृषी विभागाने बियाण्यांसाठी काही बंधने घातली आहेत. त्यासाठी कृषी विभागाने काही गुणवता निकष लागू केले आहेत. बियाण्यांची उगवणक्षमता, टक्केवारी, शुद्धता आणि आर्द्रता ही कृषी विभागाने निश्चित केलेल्या मानांकनानुसार असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बियाण्यांसाठी आवश्यक ते माहितीचे लेबलिंग करणे गरजेचे आहे.

बियाणे विक्रीवर नियंत्रण

शेतकऱ्यांना देण्यात येणारे सत्यप्रत बियाणे आता साथी पोर्टलवर नोंदणी करूनच दिले जाणार आहे. त्यामुळे उत्पादक कंपनीपासून तयार झालेल्या बियाण्यापासून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापर्यंतच्या प्रक्रियेवर आता कृषी विभागाचे नियंत्रण राहणार आहे. त्यासाठीची सिस्टिम तयार केली आहे.

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमरावतीत दगडाने ठेचून युवकाची हत्या
Next Article भुजबळ आणि माझ्यात मतभेद नाहीत – कोकाटे

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?