Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विराट कोहली-केएल राहुल भर सामन्यात भिडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

विराट कोहली-केएल राहुल भर सामन्यात भिडले

admin
Last updated: 2025/04/28 at 2:42 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 28 एप्रिल (हिं.स.)।आयपीएलच्या ४६व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली. मात्र या सामन्यात खेळाच्या जोडीला एक अनपेक्षित घटना घडली – विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात भर मैदानात वाद झाला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात दुसऱ्या डावादरम्यान, आरसीबीच्या फलंदाजीच्या वेळी हा प्रकार घडला. कुलदीप यादव आठवी ओव्हर टाकत असताना विराट कोहली आणि दिल्लीचा विकेटकीपर केएल राहुल यांच्यात काहीसे खटके उडाले. विराट काहीतरी बोलत स्टंप्सजवळ गेला आणि केएल राहुलला हातवारे करत काही सांगताना दिसला, तर राहुल त्याचे स्पष्टीकरण देत होता.

केएल राहुलने काहीतरी म्हटले, जे विराटला मान्य नव्हते. त्यामुळे विराट त्याच्याशी थेट संवाद साधायला गेला. दोघांमध्ये काही क्षण तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र वादाचा नेमका विषय काय होता, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही, मैदानावर दोन मोठ्या खेळाडूंमध्ये असा प्रसंग घडल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली.

या वादाच्या पार्श्वभूमीवर आरसीबीने मात्र सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीसमोर १६३ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल, आरसीबीने केवळ ४ विकेट्स गमावत १८.३ ओव्हरमध्ये १६५ धावा करत ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला.या विजयासह आरसीबीने आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत जोरदार झेप घेतली आहे. आरसीबीने १२ गुणांसह पहिले स्थान पटकावले असून, त्यांनी गुजरात टायटन्सला मागे टाकले आहे. त्यामुळे आरसीबीचे प्लेऑफ स्थान जवळजवळ निश्चित झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

—————

You Might Also Like

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

लखनौला हरवून आरसीबी क्वालिफायर १ मध्ये दाखल

आयपीएल गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशीचे बिहारमध्ये जंगी स्वागत

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचे संदर्भ हटवले
Next Article पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?