Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘कोरोना रिंगटोन’मुळे नागरिकांचे जातायत साडेदहा कोटी तास वाया
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थ

‘कोरोना रिंगटोन’मुळे नागरिकांचे जातायत साडेदहा कोटी तास वाया

Surajya Digital
Last updated: 2021/01/18 at 11:01 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : कोरोना संसर्गाचे संकट ओढवल्यापासून प्रत्येक मोबाइल कॉल करण्याआधी एक संदेश वाचला जातो. यासंदर्भात अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार, या संदेशामुळे नागरिकांचे दररोज सुमारे साडेदहा कोटी तास (१.३० कोटी मनुष्य तास) वाया जातात. याचा नेमका त्रास कसा होतो, याबाबत मुंबईकरांनीही आपले अनुभव मांडले आहेत.

सरकारी कंपनीत नोकरीला असलेले अनिल गांगुर्डे यांनाही या संदेशाचा त्रास होतो. गांगुर्डे म्हणाले, ‘मी माझ्या कंपनीच्या महाव्यवस्थापकांचे काम बघतो. यासाठी त्यांचे फोन सतत मलाच घ्यावे लागतात. रोज अनेकांना त्यांच्या वतीने फोन करावे लागतात. यामध्ये संदेशामुळे अडथळे येतात. सातत्याने संदेश ऐकावे लागत असल्याने रोजच्या कामाचा वेळही वाया जातो. दिवसभरात तासाभराचा वेळ वाया जातो.

अनंता निमस्कर हे तंत्रज्ञ आहेत. घरोघरी जाऊन ते फ्रिज, वॉशिंग मशिन दुरुस्तीचे काम करतात. प्रामुख्याने मध्य व उत्तर मुंबईत ते काम करतात. ते म्हणाले, ‘अनेकदा एखादा ग्राहक कॉल करतो. या संदेशामुळे कॉल लवकर लागत नाही. त्यामुळे तो अर्धवटच कॉल बंद करतो. अनेकदा या संदेशाच्या टेपमुळे समोरच्या ग्राहकाला लवकर कॉल करता येत नाही. मला रोज साधारण दहा जणांच्या घरी जावे लागते. त्या दहा जणांना किमान तीन वेळा कॉल करावा लागतो. प्रत्येक वेळी किमान ३० सेकंदाचा संदेश ऐकावा लागतो. यानुसार १५०० सेकंद तसेच वाया जातात. अन्य कॉल असतात ते वेगळेच.

दीपक शिरस्ते हे एका राज्य सरकारी कंपनीत निविदा संदर्भातील विभागात आहेत. ‘मला निविदेसंदर्भात दररोज किमान ४० कॉल करावे लागतात. अनेकदा एखाद्या निविदादाराचा कॉल येतो. तो उचलला न गेल्यास त्यांना पुन्हा कॉल करावा लागतो. या प्रक्रियेत संदेश ऐकण्यात वेळ जातो. मग तो निविदादार विलंब झाल्याने कॉल घेत नाही. रोजच्या किमान ४० कॉलपोटी किमान अर्धा तास वाया जातो.

– असा आहे मिनिटांचा हिशेब

* भारतातील रोजचे कॉल : ३०० कोटी

* एका फोनवरील रोजचे सरासरी कॉल : ३

* कोरोना संदेश ऐकण्यात जाणारा वेळ : ३ कोटी तास

एकूण रोजचे नुकसान : १० कोटी तास (१.३० कोटी मनुष्य तास)

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #कोरोनारिंगटोनमुळे #नागरिकांचे #जातायत #साडेदहाकोटी #तासवाया
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘बालाकोट एअर स्ट्राईक’बद्दल इम्रान खान यांनी केले मोदींविषयी गंभीर विधान
Next Article माजी सहकारमंत्री गटाची पीछेहाट, संपर्क तुटल्याचा फटका, त्यात सर्वपक्षीय आघाड्यांना पसंती

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?