Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुढच्या २४ ते ३६ तासांमध्ये भारत पाकिस्तानवर हल्ला करु शकतो, पाकिस्तानी मंत्र्याचा दावा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पुढच्या २४ ते ३६ तासांमध्ये भारत पाकिस्तानवर हल्ला करु शकतो, पाकिस्तानी मंत्र्याचा दावा

admin
Last updated: 2025/04/30 at 12:42 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

लाहोर , 30 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढत चालला आहे. भारताने पाकिस्तान विरुद्ध उचललेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.त्यामुळे पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री दीड वाजता एक पत्रकार परिषद घेतली. मंत्री अताउल्लाह तरार यांनी दावा केला की, पुढच्या २४ ते ३६ तासांमध्ये भारत पाकिस्तानवर हल्ला करु शकतो. आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.

मंत्री तरार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत म्हटलं की, पाकिस्तानला गोपनीय आणि विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. पहलगाम हल्ल्याचं निमित्त करुन भारत पुढच्या २४ ते ३६ तासांमध्ये लष्करी हल्ला करु शकतो. माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांचं हे विधान पंतप्रधान मोदींच्या मंगळवारी ( दि.२९) केलेल्या विधानानंतर आलं आहे. मोदी म्हणाले होते की, भारताला आता दहशतवादाविरोधातली लढाई तीव्र करावी लागेल. त्यासाठी लष्कराला मोकळीक देण्यात येत असून पहलगाम हल्ल्याच्या गुन्हेगारांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे.

पाकिस्तानी मंत्री तरार म्हणाले की, कोणत्याही आक्रमक कारवाईचं सडेतोड उत्तर दिलं जाईल. खुद्द पाकिस्तान दहशतवादाचा शिकार आहे. त्यामुळे आम्हाला हे दुःख माहिती आहे. जगभरात आम्ही कायमच दहशतवादाचा निषेध केलेला आहे. पहलगाम हल्ल्याची वस्तूस्थिती समोर यावी, यासाठी आम्ही एक पारदर्शकर आणि विश्वसनीय समिती गठीत केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी यापूर्वीच पाकिस्तान हायअलर्टवर असल्याचं म्हटलं होतं. देशाच्या अस्तित्वावर धोका निर्माण झाल्यास आम्ही अण्वस्त्राचा वापर करु, असंही ते म्हणाले होते. एकूणच पाकिस्तानच्या मनामध्ये धडकी भरल्याचं चित्र दिसून येत आहे.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात झालंय मरण स्वस्त, जणू आत्महत्यांची लाट डॉ. वळसंगकरानंतर आत्महत्येने वाढले ग्लॅमर
Next Article आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडात संशयास्पद मृत्यू

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?