Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 8.86 कोटी बोगस कर्जमाफी प्रकरणी विखेंच्या राजीनाम्याची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

8.86 कोटी बोगस कर्जमाफी प्रकरणी विखेंच्या राजीनाम्याची मागणी

admin
Last updated: 2025/04/30 at 1:26 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अहिल्यानगर दि. 30 एप्रिल (हिं.स.) : पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याच्या आठ कोटी 86 लाख रुपये कर्जमाफी प्रकरणी भाजप नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचे सह 54 व्यक्तींविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार लोणी पोलीस स्टेशनला फसवणूक ,कट करणे, बनावट दस्तऐवज तयार करणे अशा विविध कलमाखाली नुकताच व अजामीनपात्र व दखलपत्र असा गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे.आता नैतिकता म्हणून मंत्री विखे यांनी आपल्या मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा.विखेंनी राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी तो राजीनामा घ्यावा,अशी मागणी विखे कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी व ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट सुरेश लगड यांनी केली आहे.

ऍडव्होकेट सुरेश लगड यांनी म्हटले आहे की,ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे.या संदर्भात विखे कारखान्याचे सभासद बाळासाहेब केरूनाथ विखे पाटील यांनी लोणी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झालेला आहे. साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना बेसल डोस चे पैसे वाटप करायचे कारण देत बँकेतून आठ कोटी 86 लाखाचे कर्ज घेतले.ते शेतकऱ्यांना न देता त्याचा गैरवापर केला व कर्जमाफीत हे कर्ज माफ करून घेत मोठी फसवणूक केलेली आहे.

अखेर सर्वोच्च न्यायालयाने फिर्यादी बाळासाहेब विखे पाटील यांना न्याय दिला.विशेष म्हणजे दाखल असलेल्या गुन्ह्यास भादवी कलम 415, 420,464,465 ,467,471 ,34 व 120 ब लावलेले आहेत.या कलमापैकी कलम 420 खाली सात वर्षांपर्यंत कारावास व दंडाची शिक्षेची तरतूद आहे.तर कलम 467 खाली दहा वर्ष सक्त मजुरी किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.अशा प्रकारचा गंभीर गुन्हा मंत्री विखे यांनी केलेला असल्याने त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा देणे आवश्यक आहे.मंत्रिमंडळाची बैठक चौंडी (जामखेड )येथे होत आहे त्या बैठकीस माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आरोपी मंत्री विखे यांना बोलावू नये.बळीराजाच्या नावा खाली हा गैरप्रकार घडला ही अशोभनीय व गंभीर बाब आहे असे म्हटले आहे, असे ॲड सुरेश लगड यांनी म्हटले आहे.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व श्रद्धांजली म्हणून अमरावतीत कॅडल मार्च
Next Article हजारो दिव्यांंच्या लख्ख उजेडात न्हाले यावली शहीद, राष्ट्रसंतांचा जन्मोत्सव सोहळा

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?