Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: छत्तीसगड : चकमकीत 22 नक्षलवाद्यांना कंठस्नान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

छत्तीसगड : चकमकीत 22 नक्षलवाद्यांना कंठस्नान

admin
Last updated: 2025/05/07 at 7:20 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

रायपूर, 07 मे (हिं.स.) : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांनी 22 हून अधिक नक्षलवाद्यांना ठार केले. पोलिस अधिकाऱ्यांनी आज, बुधवारी ही माहिती दिली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनीही चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान घटनास्थळी चकमक आणि शोधमोहिम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले की, छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांजवळ गेल्या काही दिवसांपासून नक्षलविरोधी कारवाई सुरू आहे आणि आम्हाला मोठे यश मिळाले आहे. आतापर्यंत तेथे 22 हून अधिक नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. ऑपरेशन चालू आहे. त्याच वेळी, कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. कारण कारेगुट्टामध्ये अजूनही ऑपरेशन सुरू आहे. सुरक्षा दल नक्षलवाद्यांवर सतत हल्ले करत आहेत. मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.

हे लक्ष्य लक्षात घेऊन, सातत्याने ऑपरेशन्स राबवल्या जात आहेत. बस्तर प्रदेशात सुरू केलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाईंपैकी एक असलेल्या या मोहिमेत जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर्स आणि छत्तीसगड पोलिसांचे एसटीएफ, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (कोब्रा) यासह विविध तुकड्यांचे सैनिक सहभागी आहेत. बिजापूर (छत्तीसगड) आणि मुलुगु आणि भद्राद्री-कोठागुडेम (तेलंगणा) दरम्यानच्या आंतरराज्य सीमेच्या दोन्ही बाजूंना सुमारे 800 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या खडकाळ भूभागात आणि घनदाट जंगलात ही कारवाई सुरू आहे. हे ठिकाण राजधानी रायपूरपासून 450 किलोमीटर अंतरावर आहे.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हे धर्माविरुद्ध नाही तर दहशतवादा विरोधात युद्ध – भुजबळ
Next Article माजी उपसरपंच लताबाई कराळे हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?