शिमला, ७ जून, (हिं.स.) – देशाच्या प्रगतीचे खरे सारथी
आपले युवकच आहेत. त्यांचे ज्ञान व
समर्पणातून भारत एक आत्मनिर्भर व उन्नत राष्ट्र बनेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. शनिवारी हिमाचल
प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील डॉ. यशवंत सिंह परमार औद्यानिकी व वानिकी विद्यापीठ,
नौणी येथे आयोजित “विकसित भारत : युवा
कृषी वैज्ञानिक दृष्टिकोन व संकल्प” या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी
प्रेरणादायी संवाद साधला.
संवादाची सुरुवात अत्यंत
सौम्य व आत्मीय वातावरणात झाली. उपराष्ट्रपतींनी सांगितले की, त्यांची पत्नीही कार्यक्रमास येऊ इच्छित होत्या,
मात्र काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही.
त्यांनी शालिनी माता यांचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे सांगितले.
स्वतःच्या जीवनातील अनुभव
सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारधारा ठेवण्याचे आणि समाज व
राष्ट्र उभारणीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
उपराष्ट्रपती धनखड यांनी
हिमाचल प्रदेशाची प्राकृतिक सुंदरता, वीरभूमीची ओळख आणि येथील संस्कृती व जनभावना यांचे कौतुक केले. त्यांनी
“ऑपरेशन सिंदूर” च्या यशाचा उल्लेख करत, त्याला राष्ट्राची सामूहिक जाणीव व संकल्पशक्ती असे
संबोधले.
उपराष्ट्रपतींनी
विद्यार्थ्यांना सांगितले की, सरकारी नोकरी ही
एकमेव पर्याय नसून, उद्यमिता,
नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात
करिअरची मोठी संधी आहे. त्यांनी कृषी क्षेत्रात एआय (AI) व एजीआय (AGI) चा वापर करून ग्रामीण भारताला समृद्ध करण्यावर भर दिला.
कार्यक्रमानंतर
विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, उपराष्ट्रपतींचे मार्गदर्शन प्रेरणादायी होते. एआय आणि सस्टेनेबल अॅग्रीकल्चर या विषयांवरील
संवादाने त्यांना नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा दिली.
—————