Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: छत्तीसगड : चकमकीत 22 नक्षलवाद्यांना कंठस्नान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

छत्तीसगड : चकमकीत 22 नक्षलवाद्यांना कंठस्नान

admin
Last updated: 2025/05/07 at 7:20 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

रायपूर, 07 मे (हिं.स.) : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांनी 22 हून अधिक नक्षलवाद्यांना ठार केले. पोलिस अधिकाऱ्यांनी आज, बुधवारी ही माहिती दिली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनीही चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान घटनास्थळी चकमक आणि शोधमोहिम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले की, छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांजवळ गेल्या काही दिवसांपासून नक्षलविरोधी कारवाई सुरू आहे आणि आम्हाला मोठे यश मिळाले आहे. आतापर्यंत तेथे 22 हून अधिक नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. ऑपरेशन चालू आहे. त्याच वेळी, कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. कारण कारेगुट्टामध्ये अजूनही ऑपरेशन सुरू आहे. सुरक्षा दल नक्षलवाद्यांवर सतत हल्ले करत आहेत. मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.

हे लक्ष्य लक्षात घेऊन, सातत्याने ऑपरेशन्स राबवल्या जात आहेत. बस्तर प्रदेशात सुरू केलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाईंपैकी एक असलेल्या या मोहिमेत जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर्स आणि छत्तीसगड पोलिसांचे एसटीएफ, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (कोब्रा) यासह विविध तुकड्यांचे सैनिक सहभागी आहेत. बिजापूर (छत्तीसगड) आणि मुलुगु आणि भद्राद्री-कोठागुडेम (तेलंगणा) दरम्यानच्या आंतरराज्य सीमेच्या दोन्ही बाजूंना सुमारे 800 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या खडकाळ भूभागात आणि घनदाट जंगलात ही कारवाई सुरू आहे. हे ठिकाण राजधानी रायपूरपासून 450 किलोमीटर अंतरावर आहे.

You Might Also Like

भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणा-यांवर कारवाई करा – नाना पटोले

फसवणूक टाळण्यासाठी ‘साथी’ ऑनलाइन नोंदणीनंतरच आता विकता येणार बियाणे

अमरावतीत दगडाने ठेचून युवकाची हत्या

छगन भुजबळ यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांचा बांगलादेशाचे युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस नकार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हे धर्माविरुद्ध नाही तर दहशतवादा विरोधात युद्ध – भुजबळ
Next Article माजी उपसरपंच लताबाई कराळे हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

Latest News

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार
सोलापूर May 20, 2025
उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी
सोलापूर May 20, 2025
सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख
सोलापूर May 20, 2025
जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी
सोलापूर May 20, 2025
मेघालयात अवैध बांगलादेशी कुटुंब पकडले
देश - विदेश May 20, 2025
अमेरिकेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे 4 कोटींचे नुकसान
देश - विदेश May 20, 2025
भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी
देश - विदेश May 20, 2025
अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस
Hot News May 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?