Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारत-पाकिस्तान पोस्टल आणि पार्सल सेवा बंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारत-पाकिस्तान पोस्टल आणि पार्सल सेवा बंद

admin
Last updated: 2025/05/03 at 6:31 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 03 मे (हिं.स.) : भारताने पाकिस्तानला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या पोस्टल आणि पार्सल सेवा बंद केल्या आहेत. आता पोस्ट आणि पार्सल हवाई किंवा जमिनीच्या मार्गाने पाठवता किंवा प्राप्त करता येणार नाहीत. यासंदर्भात आज, शनिवारी डेप्युटी डायरेक्टर जनरल लक्ष्मीकांत दश यांनी हे आदेश जारी केले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हिंदूच्या सामूहिक हत्येनंतर भारत पाकिस्तानच्या विरोधात एकामागून एक पावले उचलत आहे. पोस्ट आणि पार्सलवर बंदी घालण्याचा निर्णय त्याच मालिकेचा एक भाग आहे. नवीन आदेशानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता टपाल (पोस्टल) आणि पार्सल सेवांना स्थगिती देण्यात आली आहे. डीडीजी लक्ष्मीकांत दश यांनी आज, शनिवारी 3 मे 2025 रोजी हे आदेश जारी केले आहेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात टीआरएफने 26 हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होते. टीआरएफ ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाची शाखा आहे.

यापूर्वी, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत (सीसीएस) अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये, 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला. यामुळे अटारी सीमेवरील तपासणी नाका तात्काळ बंद करण्यात आला. याशिवाय, सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती. भारतात उपस्थित असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी 48 तासांचा कालावधी देण्यात आला होता. पहलगाम हल्ल्यानंतर बिहार येथील जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला होता. त्यानंतर ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले होते. पहलगाममधील दोषींना कठोर शिक्षा देण्याची गरज त्यांनी पुन्हा व्यक्त केली होती. त्यानंतर आज, शनिवारी 3 मे रोजी पंतप्रधानांनी दहशतवाद्यांच्या पोशिंद्यांचा नायनाट करण्याचा पुनरूच्चार केला आहे.

You Might Also Like

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू

ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन

भारताने नष्ट केलेल्या दहशदवादी तळांचे पुनर्वसन करू- पाकिस्तान

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ

यूपीएससीच्या अध्यक्षपदी अजय कुमार यांची नियुक्ती

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फेलोशिपच्या प्रतिक्षेतील 480 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Next Article जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी..; काँग्रेसची बॅनरबाजी भाजपच्या जिव्हारी

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?