Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारत-पाकिस्तान पोस्टल आणि पार्सल सेवा बंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारत-पाकिस्तान पोस्टल आणि पार्सल सेवा बंद

admin
Last updated: 2025/05/03 at 6:31 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 03 मे (हिं.स.) : भारताने पाकिस्तानला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या पोस्टल आणि पार्सल सेवा बंद केल्या आहेत. आता पोस्ट आणि पार्सल हवाई किंवा जमिनीच्या मार्गाने पाठवता किंवा प्राप्त करता येणार नाहीत. यासंदर्भात आज, शनिवारी डेप्युटी डायरेक्टर जनरल लक्ष्मीकांत दश यांनी हे आदेश जारी केले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हिंदूच्या सामूहिक हत्येनंतर भारत पाकिस्तानच्या विरोधात एकामागून एक पावले उचलत आहे. पोस्ट आणि पार्सलवर बंदी घालण्याचा निर्णय त्याच मालिकेचा एक भाग आहे. नवीन आदेशानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता टपाल (पोस्टल) आणि पार्सल सेवांना स्थगिती देण्यात आली आहे. डीडीजी लक्ष्मीकांत दश यांनी आज, शनिवारी 3 मे 2025 रोजी हे आदेश जारी केले आहेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात टीआरएफने 26 हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होते. टीआरएफ ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाची शाखा आहे.

यापूर्वी, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत (सीसीएस) अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये, 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला. यामुळे अटारी सीमेवरील तपासणी नाका तात्काळ बंद करण्यात आला. याशिवाय, सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती. भारतात उपस्थित असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी 48 तासांचा कालावधी देण्यात आला होता. पहलगाम हल्ल्यानंतर बिहार येथील जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला होता. त्यानंतर ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले होते. पहलगाममधील दोषींना कठोर शिक्षा देण्याची गरज त्यांनी पुन्हा व्यक्त केली होती. त्यानंतर आज, शनिवारी 3 मे रोजी पंतप्रधानांनी दहशतवाद्यांच्या पोशिंद्यांचा नायनाट करण्याचा पुनरूच्चार केला आहे.

You Might Also Like

राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार

विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन

चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर

ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन

प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फेलोशिपच्या प्रतिक्षेतील 480 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Next Article जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी..; काँग्रेसची बॅनरबाजी भाजपच्या जिव्हारी

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?