Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जालना – शेतात विजेचा झटका बसून वडिलांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

जालना – शेतात विजेचा झटका बसून वडिलांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

admin
Last updated: 2025/06/10 at 7:50 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

जालना, १० जून, (हिं.स.) : जालना जिल्ह्यातील वरुड गावात वटपौर्णिमेच्या दिवशी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करत असताना तुटलेल्या विद्युत वायरचा स्पर्श झाल्याने वडील आणि त्यांची दोन चिमुकली मुले यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मस्के हे आपल्या शेतात मल्चिंग पेपर अंथरण्याचे काम करत होते. त्याच दरम्यान, शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीतील एक वायर तुटलेली होती आणि ती त्यांच्या शरीरास स्पर्श झाली. यामुळे त्यांना जोरदार विद्युत झटका बसून ते जमिनीवर कोसळले.

हे पाहून त्यांची मुले, श्रद्धा मस्के आणि समर्थ मस्के, धावत जाऊन वडिलांना उठवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, वडिलांच्या शरीरात अद्याप विद्युत प्रवाह असल्याने दोघांनाही तीव्र झटका बसला होता.

घटना घडताना विनोद मस्के यांच्या पत्नीने हा भयावह प्रसंग डोळ्यांसमोर पाहिला. त्यांनी जोरजोराने आरडाओरड केली. आवाज ऐकून आजू बाजूचे शेतकरी घटनास्थळी धावले आणि तत्काळ वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर तिघांनाही तातडीने जालन्यातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.

वटपौर्णिमेसारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या अपघातामुळे वरुड गावात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरावर शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी या दुर्घटनेनंतर शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांची तपासणी करावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीकडे केली आहे.

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक समीकरण – मुख्यमंत्री
Next Article सत्यजित पाटणकर आणि वैभव पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?