Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये ‘शेवंता’च्या भूमिकेत आता दिसणार ही अभिनेत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये ‘शेवंता’च्या भूमिकेत आता दिसणार ही अभिनेत्री

Surajya Digital
Last updated: 2021/11/24 at 10:42 PM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

मुंबई : रात्रीस खेळ चाले या मराठी मालिकेचे तिसरे पर्व सध्या सुरू आहे. पण मालिकेत आता मोठा बदल करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. शेवंताच्या भूमिकेमुळं घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. अपूर्वाच्या जागी नवीन अभिनेत्री दिसणार आहे. सोशल मीडियावर या नवीन शेवंताचा फोटो व्हायरल झालाय. यापुढं अभिनेत्री कृतिका तुळसकर शेवंताची भूमिका साकारणार आहे.

यामुळे आता  ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या तिस-या पर्वातून (रात्रीस खेळ चाले ३) शेवंता उर्फ अपुर्वा नेमळेकर बाहेर पडणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाला आहे. झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना आवडली असून दर्शकांना खिळवून ठेवलं आहे.

पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय. कारण दोन भागांची सांगड घालून रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत अनेक रहस्य उलगडली जात आहेत.

गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी मालिका म्हणून ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेला ओळखले जाते. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक घर केले आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेने प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळवलं. अगदी पहिल्या पर्वापासूनच या मालिकेनं लोकप्रियतेचे शिखर गाठलं. या मालिकेतील सर्व कलाकार प्रेक्षकांचे अत्यंत आवडते आहेत. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे शेवंता. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने शेवंताची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. अपुर्वानं तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच सर्वांची आकर्षण ठरली आहे. तिसऱ्या भागातही शेवंता चर्चेत राहिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नाईकांच्या वाड्यातल्या शुभ कार्यापासून झालेली मालिका वाड्यात वावरणाऱ्या अण्णा शेवंतांच्या अतृप्त आत्म्यापर्यंत येऊन पाहोचली. माईने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी वाडा शेवंतांच्या ताब्यात दिला असला, तरी वाड्याबद्दल असलेली तिची आपुलकी आणि मुलांवर असलेला जिव्हाळा यामुळे माईचे प्रयत्न नक्कीच थांबलेले नाहीत.

* वाढलेल्या वजनामुळेच अपूर्वाची एक्झिट

अपुर्वा तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. तिसऱ्या भागातही शेवंता चर्चेत राहिली आहे. शेवंताच्या भूमिकेसाठी अपुर्वाने १२ किलो वजन वाढवले. पण दुर्दैवाने हेच वजन तिला मालिका सोडण्याचे कारण ठरले आहे. वाढलेल्या वजनामुळे तिला सहकलाकारांकडून कसे टोमणे खावे लागायचे, त्याला कंटाळून मी कशी मालिका सोडत आहे, या सर्व त्रासाबाबत तिने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तीन पानी पत्र लिहून प्रेक्षकांना कळवले आहे.

* अपूर्वा काय म्हणते इन्स्टाग्राम पोस्टमध्ये…आहे तसे वाचा

‘शेवंता’ बस नाम ही काफी हैं, पर कभी कभी ये इतनाहीं काफी नहीं होता.
‘शेवंता म्हणून, आपली एक ओळख आणि नंतर ते जिव्हाळ्याचे नाते या एका साध्या अपूर्वाशी जोडले गेले. एक अभिनेत्री म्हणून मला हि भूमिका करताना खूप मजा आली आणि समाधानही वाटले. खरं सांगायचं तर ‘शेवंता चे सादरीकरण हे मला सहज जमत गेले, जणू काही मीच ती शेवंता अशी एक चेतना, आजवर मी जगत आले. त्या भूमिके मधले नाविन्य, त्या व्यक्ती रेखेतील विविध पैलू, निरनिराळ्या छटा यामुळे प्रेक्षकां मध्ये ‘शेवंता’ हि अजरामर झाली. शेवंताची भूमिका मला खूप काही देऊन गेली.
असे सर्व काही छान घडत असताना, आपल्या सर्वांच्या मनात एकच उत्सुकता असेल, की मी ‘शेवंता’ च्या भूमिकेचा का त्याग केला. असे काय घडले ज्याने मला हा प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला? मला माझ्या सोशल मीडियावर कर्मेटमार्फत, ईमेल्स मधून प्रेक्षकांनी या बद्दल विचारना केली. त्यांच उत्तर देणं हीं माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि या गोष्टीचा उलगडा करणे हें माझं कर्तव्य समजून याचा खुलासा करीत आहे.
शेवंता या भूमिकेसाठी मी 10 किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढल्यावर ज्या काही निगेटिव्ह कॉमेंट, आल्या त्याला मी फेस करत आले. परंतु आता सेटवर काम करत असताना अगदीच नवख्या आणि काही जेष्ठ कलाकारांनी विनाकारण या वाढलेल्या वजनावर माझे विडंबण केले. उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट्स तर मला जिव्हारी लागतील अश्या जाणीवपूर्वक वारंवार केले गेल्या. त्याबद्दल वरिष्ठानी त्यावर कारवाई केल्यानंतरहीं, संबंधित नवख्या कलाकारांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही.

तुम्हाला माहितीच आहे की RKC चं शूटिंग हे सावंतवाडीत चालु . आहे. मी मुंबईवरून 12 तासाचा ट्रेन नं प्रवास करुन जात होते. मला शूटिंग करता बोलावल्यानंतर फक्त एकच दिवस शूट करुन नंतर 3-4 दिवस काहीच शूट केल जात नव्हतं. असं महिन्याभरात केवळ 6 ते 7 दिवसच काम लागत होतं. आणि त्याकरिता मला वारंवार प्रवास करावा लागत होता. त्यात माझा अमूल्य वेळ संपूर्ण महिनाभर वाया जात होता.
production हाऊस कडून मला सांगण्यात आलं होतं की तिसऱ्यां सीजन साठी तुमचे आम्हाला 5 ते 6 दिवसच लागणार आहेत म्हणून तेव्हा मी नकार दिल्यानंतर चॅनेल कडून मला आणखी एक शो देण्याच आश्वासन दिलं गेल. परंतु 5 ते 6 महिने झाले अध्याप ते आश्वासन पाळलं गेलं नाही. त्यामुळे माझं आर्थिक नुकसान होत आहे.
असाच प्रकार गेल्या वर्षी सुद्धा झी युवा वरील ‘तुझं माझं जमतंय या मालिकेच्या वेळी घडला. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही म्हणून त्याबाबत सुद्धा चॅनेल कडून एकही पैसा बुडणार नाही. असं आश्वासन दिलं गेलं होतं. अध्याप पर्यत तो चेक मिळाला नाही आणि ते सुद्धा आश्वासन पाळलं गेलं नाही.

मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केलं. परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मला मिळतं नसेल. आणि माझ्या प्रामाणिक कष्टाची, अवहेलना जिथं होतं असेल.. आणि नवख्या कलाकाराकडून अपमास्पद वागणूक मिळतं असेल अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी या शो मध्ये नं राहण्याचा निर्णय घेतला.
या सर्व पार्श्वभूमीवर माझ्या जिव्हाळ्याच्या शेवंता तून मला बाहेर पडावे लागले दुर्दैव आहे परंतु हा सर्वस्वी माझा वैयत्तिक निर्णय आहे. आयुष इथेच थांबले नाही, आणखीन काही नवीन रोल्स, मी करत राहीन. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच सदैव होत राहील अशी मी आशा करते. हीच माझी एकमेव प्रेरणा आहे.

* अपूर्वा नेमळेकर

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Kritika #Apoorva #now #actress #role #Shevanta #RatrisKhelChale, #रात्रीसखेळचाले #शेवंता #भूमिकेत #अपूर्वा #अभिनेत्री #कृतिका #
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पतीने केले दुसरे लग्न केल्याने पहिल्या पत्नीने केले विषप्राशन
Next Article ‘खेला होबे’ म्हणत ममतांनी मेघालयात रात्री 12 काँग्रेस आमदार फोडले

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?