Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शाश्वत कृषी विकासासाठी नैसर्गिक शेती गरजेची – चंद्रकांत पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

शाश्वत कृषी विकासासाठी नैसर्गिक शेती गरजेची – चंद्रकांत पाटील

admin
Last updated: 2025/07/05 at 4:25 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुणे, 5 जुलै (हिं.स.) देशाच्या आर्थिक विकासात शेतीचा सर्वाधिक वाटा आहे. मात्र अलिकडच्या काळात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचा कस कमी होत आहे.तो वाढविण्यासाठी शास्त्रशुद्ध नैसर्गिक शेतीची गरज आहे, असे मत देशाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयात ‘शाश्वत कृषी संजीवनी’ या अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

सर अल्बर्ट हॉवर्ड यांनी १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘अॅन अॅग्रिकल्चरल टेस्टामेंट’ इंग्रजी पुस्तकाचे प्रा. अनिल व्यास यांनी अनुवाद केला आहे. डॉ. शिरनामे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शरद गडाख, खासदार मेधा कुलकर्णी, आनंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मदनगोपाल वार्ष्णेय, भारतीय किसान संघाच्या प्रांत उपाध्यक्षा स्नेहलता सावंत, सेवावर्धिनीचे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन, प्रकाशक रविंद्र घाटपांडे उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “शेतीच्या उत्पन्नवाढीसाठी सरकार प्रयत्न करत असून, सेंद्रीय शेती, माती परिक्षण आणि बियाणांच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. या पुस्तकाचा विद्यार्थी आणि संशोधकांना कृषी संशोधनात नक्कीच फायदा होईल.”

देशाच्या प्रगतीत कृषी क्षेत्राचा सर्वाधिक वाटा असल्याचे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या,”रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या वापरातून शेतीचे अपरिमित नुकसान होत आहे. त्यामुळे आपल्याला जैविक शेतीकडे वळायला हवे. आधुनिकतेबरोबरच शाश्वत पारंपारिक शास्त्राचाही वापर व्हायला हवा.”

कृषी उत्पादनांच्या वाढीसाठी भूमी सुपोषण होणे गरजेचे असल्याचे सांगत प्रा. वार्ष्णेय म्हणाले, “भारतीय शेतीचा २५ वर्षे अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या सर अल्बर्ट हार्वर्ड यांनी १०० वर्षांपूर्वी हे पुस्तक लिहिले. त्यांनी नैसर्गिक शेतीचा आणि एकात्म कृषी संशोधनाचा केवळ पुरस्कार केला नाही तर इंदोरच्या होळकारांनी दिलेल्या ७५ एकर जमिनीवर कृषी संशोधन केंद्रही स्थापन केले.”

You Might Also Like

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवारांचे असंख्य कार्यकर्ते अजित पवारांकडे

काँग्रेसने पोस्ट केलेल्या पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओवर भाजपाची टीका

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठीविरोधी वक्तव्याचा परिणाम; मनसेचा हल्ला, सुशील केडिया यांची माफी
Next Article ‘जय गुजरात’ म्हणणाऱ्या महायुतीने राज्याची माफी मागावी – डॉ.हुलगेश चलवादी

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?