Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस

admin
Last updated: 2025/06/07 at 6:05 PM
admin
Share
4 Min Read
SHARE

नागपूर, 7 जून (हिं.स.) – जोपर्यंत राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत, जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलेही भवितव्य उरलेले नाही. मला वाटते की, स्वतःशी खोटे बोलून, स्वत:ला दिलासा देण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. हा आरोप यापूर्वी त्यांनी केला होता. महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहि‍णींचा राहुल गांधी अपमान करत आहेत. त्यांनी जागे झाले पाहिजे. रोज खोटे बोलले की लोकांना ते खरे वाटते, असे राहुल गांधींना वाटत आहे. त्यामुळेच त्याच त्या गोष्टी राहुल गांधी सातत्याने बोलतात, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत खळबळजनक आरोप केले. भाजपने महाराष्ट्र विधानसभा मॅच फिक्सिंग करून जिंकली. तसेच भाजपने लोकशाही कमकुवत करण्याचे षडयंत्र रचले, असे आरोप एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातून केला. त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले.

फडणवीस म्हणाले की, निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकांत किती मतदार वाढले होते, या निवडणूकीत किती वाढले हे सगळे सप्रमाण दिले. पण रोज खोटे बोलायचे ही सवय राहुल गांधी यांना लागली आहे. कारण ते स्वत:च्या मनाला समजावत आहेत. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये हार मानलेली आहे. तर, पण राहुल गांधी जमिनीवर उतरणार नाही. स्वतःशीच खोट बोलणे सोडणार नाही, खोटे आश्वासनाने दिलासा देण्याचे सोडणार नाही, तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही निवडणुकीत जिंकणार नाही, त्यांना जागे व्हावे लागेल, वस्तुस्थिती समजून घ्यावी लागेल.

अशा पद्धतीने खोटं ते नेहमी बोलत असतात मतदारांचा अपमान करत असतात. राहुल गांधीने महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला आहे. राहुल गांधी जे बोलतात ते त्यांनाही माहित नसते ऐकणाऱ्या समजत नाही.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने २८८ पैकी २३५ जागा जिंकल्या. यापैकी एकट्या भाजपने १३२ जागा जिंकल्या, जी त्यांची महाराष्ट्र विधानसभेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर, त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीला फक्त ५० जागेवर विजय मिळवता आला. हा निकाल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का होता.

राहुल गांधी यांनी म्हटले की, ही किरकोळ फसवणूक नाही तर निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी हेराफेरी आहे. २०२३ मध्ये केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या निवडीत बदल केले, ज्यामध्ये आता मुख्य न्यायाधीशांच्या जागी एका केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यामुळे निवडणूक आयोगाला निष्पक्ष राहणे कठीण झाले.

राहुल गांधींनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून केलेल्या एका पोस्टमध्ये एनडीए सरकारवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आयोगाच्या निवड पथकात फेरफार करण्यात आला, मतदार यादीत बनावट नावे जोडण्यात आली, मतदानाचे आकडे जाणूनबुजून वाढवून सांगण्यात आले, भाजपला जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी बनावट मते तयार करण्यात आली आणि पुरावे लपवण्यात आले, अशा पद्धतीने एनडीएने निवडणूक जिंकली, असेही म्हटले आहे.

महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी मी ३ फेब्रुवारीला संसदेत दिलेल्या भाषणात आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत चिंता व्यक्त केली होती. देशात झालेल्या निवडणुकांविषयी मी त्याआधीही संशय घेतलेला आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी गडबडी होतात असे मी म्हणत नाही; परंतु जे घडले आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मी छोट्या-मोठ्या गोंधळाबद्दल बोलत नाही, तर आपल्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांवर ताबा मिळवून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांबद्दल बोलत आहे. पूर्वी निवडणुकांमध्ये काही विचित्र गोष्टी होत असत; परंतु २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होती. या निवडणुकीत इतके गैरप्रकार झाले की, सर्व काही लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आलेच. अनधिकृत माहिती बाजूला ठेवली तरीही केवळ अधिकृत अशा आकडेवारीवरूनही सगळा खेळ समोर येतो. ‘मॅच फिक्सिंग’ झालेली निवडणूक लोकशाहीसाठी विषसमान आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या गोंधळ-गडबडीचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ पुरावे दोन आरोपींकडे बोट दाखवतात : निवडणूक आयोग आणि भाजप!, असे गांधी यांनी म्हटले आहे.

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
Next Article शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित करू नये; आदिवासी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?