अमरावती, 17 मार्च (हिं.स.)
यावर्षी उन्हाळा जास्त तापणार असल्याची सांगताहेत मार्च महिना लागला असून महिन्याच्या सुरुवातीलाच मोठ्याप्रमाणात पानझड सुरू झाली आहे.
यंदा काहीसा लवकरच सूर्य आग ओकू लागला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नागरिकांना तसे अनुभव येत आहेत. यावर्षी तापमानात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून, पारा ३६ अंश सेल्सिअसकडे वाटचाल करीत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये पाऱ्यात तब्बल सात ते आठ अंशाने तापमानात वाढ झाली. विविध चौफुल्यावर रसवंत्या लागल्या आहेत.
नागरिक उसाच्या रसाला अधिक पसंती देत आहेत. एसी, पंखे यांचा अधिक वापर सुरू झाला आहे. दुपारनंतर ऊन तीव्र होत जाते. अचानक ऊन वाढल्याने पंख्यांनी गती घेतली. घरगुती वीज ग्राहकांना या महिन्यापासून अधिक विजेची रक्कम अदा करावी लागणार आहे. एसी, कुलर, पंखे दिवसरात्र सुरू असल्याने विजबिलातून ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. यावर्षी गरिबाचा फ्रिज म्हणजेच माठ, रांजण महागले आहेत.