सोलापूर, 4 मे (हिं.स.)।
महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सेवांच्या नियंत्रणासाठी ‘उडान एआय कॉलिंग’ सुरू करण्यात आले आहे. दररोज १५ ते २० हजार लोकांना कॉल केले जात आहेत. आतापर्यंत एक लाख २० हजार नागरिकांशी संवाद साधला आहे. सुरुवातीला पाच विभागांच्या सेवांबाबत नागरिकांची मते जाणून घेऊन, त्या सेवा तत्पर व कार्यक्षमतेने लोकांपर्यंत पोचविल्या जातील. देशातील हा पहिलाच प्रयोग असून, अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. प्रशासन व जनतेसाठी हा प्रयोग वरदान ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा प्रशासनाच्या उडान एआय कॉलिंग या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. तसेच शुभारंभानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
—————