नवी दिल्ली : भारताने शुक्रवारी टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे भारताचा रनरेटही वाढला आहे. तसेच भारताने गुणतालिकेत 4 गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. ग्रुप 2 मध्ये आता भारताचा रनरेट (+1.619) सर्वाधिक झाला आहे. त्यामुळे भारत सेमीफायनलच्या शर्यतीत अजूनही कायम आहे. आता सर्वांच्या नजरा न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान व भारत विरुद्ध नामिबियाच्या मॅचवर लागल्या आहेत.
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने भविष्यवाणी केली आहे. एका बाजूने पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूने कदाचित इंग्लंड. हे दोन्ही संघ अंतिम फेरीत खेळतील. आणि कदाचित इंग्लंड संघ हा टी-20 वर्ल्ड जिंकेल, असं सेहवागने म्हटलं. Veerugiri.com या फेसबुक पेजवरील आपल्या खास कार्यक्रमात सेहवागने हे विधान केलं.
सराव सामन्यांच्या विजयामुळे क्रिकेट जगतात टी-20 वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार असलेला संघ म्हणचे टीम इंडिया असे सांगितले जात होते. मात्र, आता हे चित्र पालटले असून सर्वांच्या नजरा विजयाची घोडदौड कायम ठेवलेल्या पाकिस्तान संघ आणि इंग्लंडच्या संघाकडे वळल्या आहेत. खास कार्यक्रमात सेहवागने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना टी-20 वर्ल्ड कपबाबतचे भाकीत सांगितले. तो म्हणाला, ‘मला एका बाजूने पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूने कदाचित इंग्लंड.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हे दोन्ही संघ अंतिम फेरीत खेळतील. आणि कदाचित इंग्लंड संघ हा टी-20 वर्ल्ड जिंकेल. असे मत सेहवागने यावेळी व्यक्त केले.
सेहवागचे म्हणणे खरे ठरू शकते, कारण इंग्लंडचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत त्यांचा संघ कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 12 मधील सर्व सामने इंग्लंडने जिंकले आहेत. दुसरीकडे पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानच्या संघानेही आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत.
भारतीय संघाला विश्वचषकात दोन पराभव पत्करावे लागल्याने रनरेट मायनसमध्ये गेला होता. पण भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 66 धावांनी विजय साकारला आणि भारताचा रनरेट प्लस 0.073 एवढा झाला होता. भारताने स्कॉटलंडच्या सामन्यात तर दमदार देदिप्यमान कामगिरी केली. कारण भारताने फक्त 85 धावांमध्ये स्कॉटलंडच्या संघाला ऑलआऊट केले. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी 12 षटकांचे टार्गेट भारतीय संघाला देण्यात आले होते.
पण भारतीय संघाने हे आव्हान फक्त सातव्या षटकातच पूर्ण केले आणि सर्वांनाच जोरदार धक्का दिला. भारताला या सामन्यात मोठा विजय मिळवल्याचा फायदा नक्कीच झाला आहे. कारण भारताचा रनरेट आता 0.073 वरून थेट प्लस 1.619 एवढा चांगला वाढला आहे.