नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर समाजवादी पार्टीच्या नेत्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी कडाडून टीका केली आहे. सध्या समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि जया बच्चन यांच्यासहित 12 खासदारांनी सभागृहाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सपा खासदार जया बच्चन आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ 12 निलंबित राज्यसभा खासदारांच्या धरणे आंदोलनात सामील झाले.
यावेळी जया बच्चन चर्चेत आल्या आहेत. त्यावेळी त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोदींनी लाल टोपी परिधान करुन जे वक्तव्य केले आहे, त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जया बच्चन म्हणाल्या, सध्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या रॅली होत आहेत त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यावरुन जनमत आम्हाला आहे असे म्हणता येईल. विरोधक ज्या प्रकारे बोलत आहेत, त्यांच्याप्रती नागरिकांमध्ये राग आहे याचा त्यांनी विचार करावा.
युपीमधल्या निवडणूकांचा अंदाज एव्हाना लोकांना आला आहे. युपीमध्ये मोदी यांच्याहस्ते नुकतचं शिलान्यासाचं उद्धघाटन करण्यात आले.
दिल्ली: राज्यसभा से 12 सांसद के निलंबन के खिलाफ SP नेता अखिलेश यादव, जया बच्चन समेत विपक्ष के अन्य नेताओं ने संसद में गांधी प्रतिमा के सामने प्रदर्शन किया।
अखिलेश यादव ने कहा, "UP CM लाल रंग के बारे में पहले भी बोल चुके हैं, लाल रंग भावनाओं का है और BJP भावनाओं को नहीं समझती।" pic.twitter.com/6saLoCWvx0
— ANI_HindiNews (@AHindinews) December 8, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यावेळी त्यांनी डोक्यावर लाल टोपी परिधान केली होती. यावरुन जया बच्चन यांनी मोदींवर टीका केला आहे. त्या म्हणाल्या, पाच वर्षांनंतर मोदींना सगळं काही लक्षात येत आहे. त्यामुळे त्यांनी लोकांना जी आश्वासनं दिली ती पूर्ण का केली नाहीत याचं उत्तर द्यावं.
तुम्ही आम्हाला लाल टोपी म्हणजे रेड अलर्ट आहे असे म्हटला होतात. मी मात्र मोठ्या दिमाखात लाल टोपी घालणार आहे. मी पण पाहते आम्हाला लाल टोपी घालण्यावाचून कोणं कसं थांबवतं ते…
अखिलेश यादव यांनी देखील यावेळी प्रतिक्रिया देताना लाल टोपी ही सद्भभावनेचे प्रतीक असल्याचे म्हटलं आहे. लाल रंग हा क्रांती आणि बदल दर्शवतो. जो लोकांना हवा आहे. आणि ही टोपी परिधान करणारे आणखीच सुंदर दिसतात. अशी टिप्पणी यादव यांनी यावेळी केली.
एकूण तर सरकारचा जुमला आणि आता हे ‘बेचू सरकार’ही होत आहे. ते बोलत आहेत कारण त्यांना वास्तव मुद्द्यांवर चर्चा करायची नाही, अशी टीका आखिलेश यादव यांनी योगींसह भाजपवर केली. पंतप्रधानांना खूप-खूप धन्यवाद ! कारण ते आमच्या पक्षाचा प्रचार करित आहेत, असा टोला समाजवादी पक्षाच्या खासदार तथा अभिनेत्री जया बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.