Monday, October 2, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

त्यांनी मला विमानातून खाली उतरवलं, नियतीनं त्यांना खुर्चीवरून खाली खेचलं : भगतसिंग कोश्यारी

He dropped me from the plane, fate pulled him down from the chair: Bhagat Singh Koshyari Uddhav Thackeray

Surajya Digital by Surajya Digital
February 21, 2023
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
त्यांनी मला विमानातून खाली उतरवलं, नियतीनं त्यांना खुर्चीवरून खाली खेचलं : भगतसिंग कोश्यारी
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

□ राज्यपालपदावरून उतरताच कोश्यारींनी तोंड उघडलं

• मुंबई : उध्दव ठाकरे हे संत माणूस आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती.  He dropped me from the plane, fate pulled him down from the chair: Bhagat Singh Koshyari Uddhav Thackeray उध्दव ठाकरे मुख्यमंत्रिपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती. तरीही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. शरद पवारांसारखा मार्गदर्शकही उध्दव ठाकरेंना वाचवू शकला नाही. मी महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवलं होतं. आता नियतीनं त्यांना मुख्यमंत्रिपदावरून, त्या खुर्चीवरून खाली उतरवलं आहे. मी त्यांना सत्तेतून खाली खेचलं नाही, पण नियतीनं जे करायचं ते केलं, अशी खोचक टीका माजी राज्यपाल कोश्यारींनी केली. 

सोमवारी कोश्यारी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. फेब्रुवारी २०२१ मध्ये भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांना मसुरी येथे आयएएस अकॅडमी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जायचे होते. प्रोटोकॉलनुसार त्यांना सरकारी विमानाने जायचे होते. मात्र राज्य सरकारकडून संमती न मिळाल्याने भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून उतरावे लागले होते. या घटनेचा संदर्भ पकडून त्यांनी मला विमानातून खाली उतरवलं, आज नियतीनं त्यांना मुख्यमंत्रिपदावरून, खुर्चीवरून खाली खेचलं’, अशी उपरोधिक टीका कोश्यारी यांनी केली.

कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी मंजूर केली नव्हती. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना कोश्यारी म्हणाले, विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीची शिष्टमंडळं माझ्याकडे यायची. मी त्यांना एकदा मी त्यांना सांगितले की, हे पहिले पाच पानी पत्र बघा. पाच पानी पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. हा कायदा, तो कायदा म्हणत धमकावत आहात. पत्रात शेवटी लिहिलं होतं की, पुढील १५ दिवसांत मंजूर करा. कुठं लिहिलं आहे की, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतात की हे एवढ्या दिवसांत मंजूर करा म्हणून ? हे कुठं लिहिलंय संविधानात ?
ते पत्र पाठवलं नसतं, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी १२ आमदारांच्या नियुक्तीच्या शिफारशींवर सही करणार होतो, असे कोश्यारी यांनी सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● ते अडकले शकुनीमामांच्या चक्रव्यूहात

 

उद्धव ठाकरे यांच्याशी माझे संबंध चांगलेच होते. पण त्यांचे सल्लागार कोण होते? शिवसेनेचे आमदार माझ्याकडे येऊन आम्हाला वाचवा. उद्धव ठाकरे हे शकुनीमामांच्या चक्रव्यूहमध्ये अडकले आहेत, असे सांगायचे. माहिती नाही की, त्यांना कोणते शकुनीमामा मिळाले होते? उद्धव ठाकरे तर सज्जन माणूस आहेत, बिचारे राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत, असे मतही उध्दव ठाकरेंविषयी कोश्यारींनी व्यक्त केले.

● पहाटेच्या शपथविधीवर काय म्हणाले कोश्यारी ?

 

पहाटेचा शपथविधी म्हणणं चुकीचं आहे. कारण तो सकाळचा शपथविधी होता. जर अजित पवार माझ्याकडे आमदारांच्या सह्या असलेलं पत्र घेऊन येतात आणि हे सांगतात की आम्हाला सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे तर मग मी काय करायला हवं होतं? देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणार हे देखील सांगितलं. सकाळीच शपथविधी करायचा हे अजित पवारांनी सांगितलं. मी हो म्हटलं. त्यात काय चुकीचं आहे? असा प्रश्न भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी उपस्थित केला.

 

● उध्दव समोर येत नव्हते

 

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा प्रस्ताव आदित्य घेऊन आला होता. तो सारखा फोन करायचा. मी त्याला विचारलं अरे तुमचा नवरदेव कुठे आहे? त्याला आधी आणा. उद्या त्याने मुख्यमंत्री होण्यास नकार दिला तर ? तरीही उद्धव ठाकरे पुढे आले नाहीत. मी त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांना सांगितले की हे चुकीचे आहे. पटलेही बोलले हे चुकीचेच आहे. विचारा छगन भुजबळ व अन्य नेत्यांना हे सत्य आहे की नाही? तीन तासांनी उद्धव ठाकरे समोर आले. यावर कोणीच काही बोलत नाही? असाही प्रश्न कोश्यारी यांनी यावेळी विचारला.

 

 

Tags: #dropped #plane #fate #pulled #down #chair #BhagatSinghKoshyari #UddhavThackeray#विमान #खाली #उतरवलं #नियती #खुर्चीवरून #खेचलं #भगतसिंगकोश्यारी #उद्धवठाकरे
Previous Post

स्वतःच्या लग्नासाठी ड्रायव्हरने मालकाच्या घरात केली चोरी; सोलापूर सोडण्याच्या बेतात असताना पकडले

Next Post

कोरवलीत प्रेमसंबंधच्या कारणावरून प्रियकराचा खून

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
कोरवलीत प्रेमसंबंधच्या कारणावरून प्रियकराचा खून

कोरवलीत प्रेमसंबंधच्या कारणावरून प्रियकराचा खून

Latest News

टोमॅटोच्या भावामुळे शेतकऱ्याचा सोलापुरात रास्ता रोको, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

टोमॅटोच्या भावामुळे शेतकऱ्याचा सोलापुरात रास्ता रोको, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

by Surajya Digital
October 1, 2023
0

...

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan   Mar »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697