Monday, October 2, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

न्यायालयाने हा प्रकार वैध ठरवला तर हृदयाजवळ ठेवलेल्या गोष्टीचा मृत्यू होईल

If the court validates this form, then the thing held close to the heart will die Kapil Sibal Argument Power Struggle

Surajya Digital by Surajya Digital
February 24, 2023
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
न्यायालयाने हा प्रकार वैध ठरवला तर हृदयाजवळ ठेवलेल्या गोष्टीचा मृत्यू होईल
0
SHARES
158
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

● कपिल सिब्बल : संस्थात्मक सार्वभौमत्व आणि राज्यघटनेची जपणूक करण्यासाठी मी इथे उभा

 

नवी दिल्ली : ‘मी हरेन किंवा जिंकेन. मात्र, मी इथे फक्त या प्रकरणासाठी उभा नाही. मी इथे आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या एका गोष्टीसाठी उभा आहे.  If the court validates this form, then the thing held close to the heart will die Kapil Sibal Argument Power Struggle संस्थात्मक सार्वभौमत्व आणि राज्यघटनेची जपणूक करण्यासाठी मी इथे उभा आहे. न्यायालयाने हा सगळा प्रकार वैध ठरवला, तर आपण १९५० सालापासून जी गोष्ट इतकी काळजीपूर्वक जपून ठेवली आहे, तिचा मृत्यू होईल’, अशा सूचक शब्दात घटनात्मक पेचप्रसंगावर अचूक बोट ठेवत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेला युक्तिवाद संपवला. मात्र हा युक्तिवाद संपवता संपवता सिब्बल स्वतः भावनावश झाले. त्यांचे डोळे पाणावले आणि कोर्टात स्मशानशांतता पसरली.

 

गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल युक्तिवाद करत होते. तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी दुपारी आपला युक्तिवाद संपवताना भारतीय राज्यघटना, या घटनेने निर्माण केलेले संस्थात्मक सार्वभौमत्व आणि त्यांच्याकडून
राज्यघटनेचीच केली जाणारी पायमल्ली यावर अचूक बोट ठेवत न्यायालयासमोरील घटनात्मक पेच सोडवायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर भाष्य केले.

 

गुरुवारी केलेल्या सलग अडीच तासांच्या युक्तिवादात सिब्बल यांनी राज्यपालांची संशयास्पद भूमिका न्यायालयासमोर मांडली. चालू असलेले सरकार राज्यपाल कोश्यारी यांनी मुद्दाम पाडले. शिवसेनेचेच सरकार असताना शिवसेनेचेच आमदार सत्ता कशी काय पाडू शकतात ? पक्षाचेच आमदार अविश्वास प्रस्ताव कसे आणू शकतात ? राज्यपालांनी अधिकाराचा गैरवापर केला. सत्तासंघर्ष सुरू असताना उध्दव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला नव्हता. शिंदे गटाने भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाले. राज्यपाल स्वत:हून बहुमत चाचणी घेऊ शकत नाहीत, असा युक्तिवाद करत सिब्बल यांनी तत्कालीन राज्यपाल कोश्यारी हे सत्तांतराच्या कटात सहभागी असल्याचे न्यायालयास निक्षून सांगितले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

@KapilSibal sir your arguments where on the point and insightful And the ending line was accurate.. #MaharashtraPoliticalCrisis @AUThackeray @ShivSenaUBT_ pic.twitter.com/DXQoos1huf

— Raviraj kadam (@kingofkolp) February 23, 2023

 

● विधानसभा अध्यक्षांकडे जाणार नाही

 

आमदार भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नेमणूक आसाममध्ये होऊ शकत नाही. गोगावले प्रतोद झाल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावण्यात येत आहे. त्यांची नेमणूकच चुकीची आहे. तसेच बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयानेच घ्यावा. विधानसभा अध्यक्षांकडे जाण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे जाणार नसल्याचेही सिब्बल यांनी युक्तिवादात म्हटले.

● न्यायालयाच्या निर्णयाचा गैरवापर

 

आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयाच्या निर्णयाआधीच निवडणूक आयोगाने केवळ आमदारांचे बहुमत गृहीत धरून निकाल दिला आहे.. ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यांना गृहीत धरून आयोग निर्णय कसा काय दिला? न्यायालयाच्या निर्णयाचा शिंदेंनी गैरवापर केला. आमच्यावर अन्याय झाला आहे. शिवसेनेत दोन गट आहेत, याची कल्पना आयोग नव्हती का ? असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला. त्यावर एका पक्षात दोन गट झाले असतील तर त्यावर आयोग निर्णय घेऊ शकतो, असे सिब्बल यांनी सांगितले.

● ठळक युक्तिवाद

→ मुळात राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवडच चुकीच्या पद्धतीने झाली आहे. या निवडीत शिंदे गटाने पक्षाच्या ‘व्हीप’चे उल्लंघन केले.

→ नार्वेकरांची निवड होण्यापूर्वी ३९ आमदारांना अपात्रतेची नोटीस देण्यात आली होती. त्यांच्यावर कोणतीच कारवाई न होता त्यांना अध्यक्षपद निवडणुकीत मतदान कसे करता आले ?

→ एकनाथ शिंदे यांच्यावरही अपात्रतेची कारवाई प्रलंबित होती, राज्यपालांनी शिंदेंना सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण कसे काय दिले? राज्यपालांची ही कृती घटनाविरोधी नव्हती का ?

→ हेतूबाबत शंका येईल असे निर्णय
राज्यपालांनी त्या काळात घेतले म्हणून उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

 

 

Tags: #court #validates #thing #held #close #heart #die #KapilSibal #Argument #PowerStruggle#न्यायालय #प्रकार #वैध #हृदय #गोष्टी #मृत्यू #सत्तासंघर्ष #युक्तिवाद #कपिलसिब्बल #महाराष्ट्र
Previous Post

राजन पाटलांना भाजपाचे आमंत्रण, बबनदादांकडून स्वीकारला सत्कार;  सावंतांचा दौरा एक, घडामोडी अनेक

Next Post

सामूहिक दुष्कर्मप्रकरणी विष्णू बरगंडेला पोलीस कोठडी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सामूहिक दुष्कर्मप्रकरणी विष्णू बरगंडेला पोलीस कोठडी

सामूहिक दुष्कर्मप्रकरणी विष्णू बरगंडेला पोलीस कोठडी

Latest News

टोमॅटोच्या भावामुळे शेतकऱ्याचा सोलापुरात रास्ता रोको, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

टोमॅटोच्या भावामुळे शेतकऱ्याचा सोलापुरात रास्ता रोको, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

by Surajya Digital
October 1, 2023
0

...

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan   Mar »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697