Wednesday, September 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

कशासाठी ? ठाकरे सरकार पाडण्यासाठी, फडणवीसांसोबत दोन वर्षात दीडशे बैठका

for what To topple the Thackeray government, one and a half hundred meetings with the Fadnavis in two years Health Minister Tanaji Sawant Matoshree step strategy

Surajya Digital by Surajya Digital
March 29, 2023
in Hot News, सोलापूर
0
कशासाठी ? ठाकरे सरकार पाडण्यासाठी, फडणवीसांसोबत दोन वर्षात दीडशे बैठका
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

● आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी उघड केली व्यूहरचना

 

परंडा : जेव्हा मंत्रिपद मिळाले नाही; तेव्हाच प्रतिज्ञा केली… पुन्हा ‘मातोश्री’ ची पायरी चढणार नाही… सरकार पाडल्याशिवाय गप्पही बसणार नाही… कामाला लागलो… देवेंद्र फडणवीस मदतीला होतेच… त्यांच्या सहकार्याने पहिली बंडखोरी मीच केली… राज्यात महाविकास आघाडी असतानाही धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली… for what To topple the Thackeray government, one and a half hundred meetings with the Fadnavis in two years Health Minister Tanaji Sawant Matoshree step strategy त्यानंतर महाराष्ट्र पिंजून काढला… फडणवीसांसोबत
दोन वर्षात तब्बल दीडशे बैठका घेतल्या… कशासाठी ?… तर ठाकरे सरकार पाडण्यासाठी… ही होती ठाकरे सरकार पाडण्याची व्युव्हरचना. ती आता पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उघड केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या पतनात भाजपचाच हात होता; हे आता उघड झाले आहे.

 

परंडा येथे आयोजित भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धे दरम्यान आयोजित कार्यक्रमात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हा राजकीय गौप्यस्फोट करून सत्तांतर नाट्यामागच्या सस्पेन्स उघड केला आहे. ठाकरे सरकार सत्तेत येण्यापूर्वी राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते.

 

त्यांच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत हे कॅबिनेट मंत्री होते. जेव्हा सन २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. निवडणुकीत भाजप- सेनेची युती होती. मात्र निवडणूक निकालानंतर ही युती तुटली आणि दोन्ही काँग्रेसच्या सहकार्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उध्दव ठाकरे हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते.

 

मंत्री सावंत यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले. तेव्हा त्याठिकाणी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आरपीआयचे सरचिटणीस संजय कुमार बनसोडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके, माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर, अनिल खोचरे, गौतम लटके, रत्नकांत शिंदे, सुरेश डाकवाले आदी उपस्थित होते.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● ‘मातोश्री’ ची पायरी न चढण्याची केली प्रतिज्ञा

 

उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल नाकारला. भाजप-शिवसेना युतीला कौल दिलेला असताना शरद पवार यांनी त्यात मिठाचा खडा टाकला. जनमत डावलून पक्षप्रमुख ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येही आपल्याला स्थान दिले नाही. त्यामुळे ‘मातोश्री’वर जाऊन ‘त्यांना’ सांगून आलो की मी आता पुन्हा या ‘मातोश्री’ची पायरी चढणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती, असे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

● सरकार पाडण्याचे काम चालले दोन वर्षे

 

पहिली बंडखोरी यशस्वी झाल्यानंतर सावंत ठाकरे सरकार पाडण्यासाठी कामाला लागले. सलग दोन वर्षे त्यांनी आमदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या भेटी घेतल्या. त्यांना समजावून सांगत त्यांचे मतपरिवर्तन केले. याकाळात देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत सतत बैठका झाल्या. जवळपास १०० ते १५० बैठका झाल्या. त्यानंतर सुरत, गुवाहाटी मार्गे ते सरकार पाडले, असा गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी यावेळी केला.

○ देवेंद्र फडणवीसांनाही पाडले खोटे

 

ठाकरे सरकार पाडण्यात भाजपचा काहीही संबंध नाही, हे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी वारंवार सांगितले आहे. मात्र तानाजी सावंत यांच्या गौप्यस्फोटाने फडणवीस यांनाही खोटे पाडले आहे. ठाकरे सरकार पाडण्याचे कटकारस्थान दोन वर्षांपासून शिजत असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे. इतकेच नव्हे तर फडणवीस यांच्या आदेशानेच हे घडत होते, असे सांगत मंत्री सावंत यांनी खळबळ उडवून दिली आहे.

○ पहिली बंडखोरी मीच केली

 

दि. ३० डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात उद्धव ठाकरे यांनी मला संधी दिली नाही. चांगले काम करूनही डावलले. त्यामुळे संतप्त होऊन आपण देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ३ जानेवारीला राज्यात पहिली बंडखोरी केली. भाजपच्या साथीने धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीची अधिकृत सत्ता स्थापन केली. त्यासाठी मी आणि सुजितसिंह ठाकूर देवेंद्र फडणवीसांकडे गेला होतो. ही महाराष्ट्रातील माझी पहिली बंडखोरी होती, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले.

 

 

Tags: #forwhat #topple #Thackeray #government #one #halfhundred #meetings #devendraFadnavis #twoyears #HealthMinister #TanajiSawant #Matoshree #step #strategy#कशासाठी #ठाकरे #सरकार #पाडण्यासाठी #देवेंद्रफडणवीस #सोबत #दोनवर्षात #दीडशे #बैठका #व्यूहरचना #तानाजीसावंत #मातोश्री #पायरी
Previous Post

हेडफोनने केला तरुणांचा घात; रेल्वेच्या अपघातात मृत्यू

Next Post

खासदार गिरीश बापट यांचे निधन, निधनाने NCP नेत्याला अश्रू अनावर

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
खासदार गिरीश बापट यांचे निधन, निधनाने NCP नेत्याला अश्रू अनावर

खासदार गिरीश बापट यांचे निधन, निधनाने NCP नेत्याला अश्रू अनावर

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb   Apr »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697