Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कांदा उत्पादकासाठी आनंदाची बातमी; 1 जानेवारीपासून कांदा निर्यातीवरील बंदी हटविली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवार

कांदा उत्पादकासाठी आनंदाची बातमी; 1 जानेवारीपासून कांदा निर्यातीवरील बंदी हटविली

Surajya Digital
Last updated: 2020/12/29 at 4:45 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कांदा निर्यातीवरील बंदी केंद्र सरकारने हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने काल सोमवारी एक आदेश जारी करत 1 जानेवारीपासून सर्व प्रकारच्या कांद्यांची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. तत्पूर्वी, सरकारने 14 सप्टेंबर 2020 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सरकारचा हा निर्णय म्हणजे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांकडे सध्या किती कांदा उपलब्ध आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी सरकारवर निशाणा साधला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अखेर आता केंद्राने हा निर्णय मागे घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारने किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती. यात किरकोळ व्यापारी 2 टन, तर ठोक व्यापारी केवळ 25 टनांपर्यंतच कांदा साठवून ठेवू शकतात, अशी अटही घालण्यात आली होती.

याच बरोबर ‘बेंगलोर रोज’ आणि ‘कृष्णपुरम कांदा’ यांच्या निर्यातीवरील बंदीदेखील 1 जानेवारीपासून उठणार आहे. या कांद्यांवर सरकारने 9 ऑक्टोबर  2020 रोजी बंदी घातली होती.  यापूर्वी सप्टेंबर 2019 मध्येही केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यावेळी मागणी आणि पुरवठा यांत मोठी दरी निर्माण झाल्याने कांद्याच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्रासारख्या प्रमुख कांदा उत्पादक राज्यात पाऊस आणि पुरामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #कांदा #उत्पादकासाठी #आनंदाची #बातमी # कांदानिर्यातीवरील #बंदी #हटविली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कार डिझायनर दिलीप छाब्रियांना मुंबई पोलिसांनी केली अटक
Next Article खुशखबर ! केंद्र सरकारच्या विविध विभागांत ६ हजार ५०६ पदांची भरती

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?