Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

‘लॉकडाऊन’ नावाची 40 फूट विहीर खोदून ग्रामस्थांनी लॉकडाऊनच नाव केले ‘चिरंतन’

Surajya Digital by Surajya Digital
July 24, 2020
in Hot News, महाराष्ट्र
0
‘लॉकडाऊन’ नावाची 40 फूट विहीर खोदून ग्रामस्थांनी  लॉकडाऊनच नाव केले ‘चिरंतन’
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभराता लॉकडाऊन जाहीर केले. सर्व जनता घरातच लॉक झाली. कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी घेत आपआपल्या परीने घरातच जीवनाच्या आनंद घेऊ लागले. पण असे काही ग्रामस्थ आहेत की ज्यांनी या लॉकडाउनबरोबर जगत ‘लॉकडाऊन’ नावाची विहीर खोदून लॉकडाऊनच नाव चिरंतन करून ठेवले. त्यात रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड ग्रामस्थांचे काम कौतुकास्पद आहे.

लॉकडाऊन जाहीर झाले. पण वेळ जात नव्हता म्हणून अनेकांनी वेगवेगळे टाईमपास करणारे खेळ सुरू केले. मात्र त्याला अपवाद ठरली ती वेळवंड भायजेवाडीतील 10 घरांची भायजे भावकी. वाढती कुटुंब संख्या दिवसेंदिवस पाण्याची वाढणारी गरज लक्षात घेऊन विहीर खोदण्याचा फक्त निर्णयच नाही तर प्रत्यक्ष तीन महिन्यांच्या कालावधीत 40 फूट विहीर खोदत इतिहास निर्माण केला आणि लॉकडाऊनच्या दुःखद आठवणींना ही सुखद करत कायमच्या स्मरणात राहतील, असे काम केले.

महादेव गोपाळ भायजे यांनी आपल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या जमिनीत विहीर खोदण्यासाठी जागा दिली. दगडातून पाणी काढणे म्हणजे रक्ताचे पाणी करण्यासारखे आहे. तरुण मुलांना विहीर खोदण्याचा अनुभव नव्हता. काही तरुण मुंबईतून आलेले तर काही रंगकाम, बांधकाम करणारे होते पण जुन्या-जाणत्या लोकांच्या मार्गदर्शनखाली सतत तीन महिने मेहनत व चिकाटीच्या जोरावर कायमस्वरूपी पाण्याची समस्येवर उपाय शोधला. पाणी पण खूप लागल्याने सर्वच ग्रामस्थ खुश आहेत.

* आता शासनाकडे केली ‘ही’ मागणी

ही विहीर खोदण्याच्या कामात महिलांचा ही वाटा खूप मोठा असल्याचे ग्रामस्थ तुकाराम भायजे यांनी सांगितले. नारायण भायजे, गणपत भायजे यांच्यासारख्या अनुभवी लोकांच्या मार्गदर्शन व सहकार्य यामुळे लॉकडाऊनचा खरा उपयोग करता आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर जि प सदस्य परशुराम कदम व पंचायत समिती सदस्य साक्षी रावणंग, सरपंच संतोष गुरव, उपसरपंच मनीष मोहिते यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. विहीर खोदून झाली पण विहिरीतील पाणी घरापर्यंत पोचवण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Tags: #रत्नागिरी #लॉकडाऊनविहीर #४०फूटविहिर #खोदकाम
Previous Post

कोरोनात जगभरातील उद्योगावर ‘संक्रांत’ आली असताना ‘या’ उद्योगाची माञ ‘दिवाळी’

Next Post

लातुरात बाल लैंगिक प्रकरणासाठी विशेष न्यायालय; राज्यात आणखी ३० विशेष न्यायालये स्थापन होणार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
लातुरात बाल लैंगिक प्रकरणासाठी विशेष न्यायालय; राज्यात आणखी ३० विशेष न्यायालये स्थापन होणार

लातुरात बाल लैंगिक प्रकरणासाठी विशेष न्यायालय; राज्यात आणखी ३० विशेष न्यायालये स्थापन होणार

वार्ता संग्रह

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
    Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697