Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

दिवाळीनंतर एका लसीच्या डोसनंतर सर्व ठिकाणी प्रवेश मिळणार!

Surajya Digital by Surajya Digital
October 17, 2021
in Hot News, महाराष्ट्र
0
दिवाळीनंतर एका लसीच्या डोसनंतर सर्व ठिकाणी प्रवेश मिळणार!
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच लसीकरणाचे प्रमाणही वाढलेले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. दिवाळीनंतर नागरिकांना कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मॉल, लोकल तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत असं राजेश टोपे यांनी म्हटलं.

सर्वात कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. त्यात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती देत कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्यांना आणखी एक दिलासा दिला आहे. लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही राज्य सरकार निर्बंधातून मुक्त करणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. मात्र, हा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

वाढत्या लसीकरणामुळे हर्ड इम्युनिटीकडे राज्य वाटचाल करत असून, दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली घट लक्षात घेऊन राज्य सरकार निर्बंध शिथिल करत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये बऱ्याच गोष्टी सुरू केल्या आहेत. शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहं-नाट्यगृहं यासह इतरही सेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर राज्य सरकार आता एक लस घेतल्यांनाही सर्व ठिकाणी प्रवेश देण्याच्या आणि राज्यात संपूर्ण अनलॉक करण्याच्या विचारात आहेत, तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

‘दिवाळीनंतर कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांनाही मॉल्स, लोकल रेल्वे तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत. दिवाळीनंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना सामोरं जावं लागत असलेल्या या असुविधेतून सुटका करण्यासाठी लसीची एक मात्रा देखील पुरेशी ठरणार आहे. टास्क फोर्सच्या सहमतीने मुख्यमंत्री दिवाळीनंतर निर्णय घेतील’, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील कोरोना परिस्थितीविषयी बोलताना टोपे म्हणाले, ‘राज्यात मोठ्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी आलेली असेल आणि टास्क फोर्स, आरोग्य विभागाची सहमती असेल तर असा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांचा कालावधी दुसऱ्या डोससाठी दिलेला आहे. त्यामुळं मोठं अंतर असल्यानं असुविधा होते. त्यामुळे आरोग्याविषयक बाब लक्षात घेऊन यावर निर्णय घेतला जाईल’, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

Tags: #After #Diwali #onedose #vaccine #places #access!#दिवाळी #एकालसी #डोस #प्रवेश
Previous Post

राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागणारी टोळी गजाआड

Next Post

बंद अवस्थेतला ‘धाराशिव’ कारखाना केला केवळ एका महिन्यात सुरू : सहकारमंत्री

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
बंद अवस्थेतला ‘धाराशिव’ कारखाना  केला केवळ एका महिन्यात सुरू : सहकारमंत्री

बंद अवस्थेतला 'धाराशिव' कारखाना केला केवळ एका महिन्यात सुरू : सहकारमंत्री

वार्ता संग्रह

October 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697