Sunday, May 29, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ – भाऊ; सध्या मोठ्या परिवर्तनाची गरज – के. चंद्रशेखर राव

Surajya Digital by Surajya Digital
February 20, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ – भाऊ; सध्या मोठ्या परिवर्तनाची गरज – के. चंद्रशेखर राव
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : देशातील राजकारण आणि विकास कामांच्या विविध मुद्यांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यावरून देशात मोठ्या परिवर्तनाची गरज आहे, यावर आमच्यात सहमती झाली असल्याची माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली. चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव यांना हैदराबादला येण्याचे आमंत्रण देणार असल्याचं ते म्हणाले.

देशातील राजकारण आणि विकास कामांच्या विविध मुद्यांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. देशात मोठ्या परिवर्तनाची गरज आहे, यावर आमच्यात सहमती झाली असल्याची माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले. याबरोबरच महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ असल्याचे के. चंद्रशेखर राव यावेळी म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात आज बैठक झाली. या बेठकीनंतर चेंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि नरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

Maharashtra and Telangana brothers – brothers; Right now a big change is needed – K. Chandrasekhar Rao

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

चंद्रशेखर राव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेवरच आम्ही चालत आहोत. महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत. आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थीतवर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातून जी सुरू गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. लोकशाहीसाठी आम्ही लढणार आहोत. याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू केली आहे. जाच्या भेटीचे पुढील काळात चांगले परिणाम दिसतील अशी आशा चंद्रशेखर रावा यांनी यावेळी व्यक्त केली.

के. चंद्रशेखर राव म्हणाले, “भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशातील परिस्थीवर बोलण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. त्यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना भेटून खूप आनंद झाला. देशाच्या विकासाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्याचे आमंत्रण देणार आहे. तेथे आम्ही एकत्र भेटून देशातील राजकारणावर आणखी चर्चा करणार आहोत.”

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सायंकाळी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी जावून शरद पवारांची भेट घेणार आहेत. दरम्यान, केंद्रातील भाजप सरकारविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत नुकतेच केसीआर यांनी दिले होते. यावर बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, चंद्रशेखर राव यांना सगळ्यांना भेटण्याचा अधिकार आहे. त्यांचे काम हे तेलंगणापर्यंत मर्यादित आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जी भूमिका मांडायची आहे ती मांडू द्या. ते भेटले तर चांगलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पण भेटले पाहिजे. राव यांचे काम हे तेलंगणापर्यंत मर्यादित आहे. तिसरी आघाडी जरी झाली तरी आम्हाला फरक पडणार नसल्याचे म्हटले.

■ सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यात मुंबईत वर्षा बंगल्यावर दीड तास भेट झाली. या भेटीनंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्यातील सदिच्छा भेट होती, त्यात काही लपवण्यासारखे नाही. तसेच सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही. देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचे एकमत झाले आहे, असं ते म्हणाले.

 

Tags: #Maharashtra #Telangana #brothers #Right #bigchange #needed #KChandrasekharRao#महाराष्ट्र #तेलंगणा #भाऊ #परिवर्तन #गरज #केचंद्रशेखरराव #ठाकरे
Previous Post

सुप्रीम कोर्टाचा ऑर्केस्ट्राबारवरून ठाकरे सरकारला दणका

Next Post

चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

वार्ता संग्रह

February 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28  
« Jan   Mar »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697