नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी MIM चे खासदार इम्तियाज़ जलील यांना राष्ट्रवादीत येण्याचे आमंत्रण दिले आहे. महाविकास आघाडीची सत्ता पाच वर्ष टिकणार आहे. या पुढेही आम्ही एकत्र लढल्यास भाजपने महाराष्ट्राची सत्ता विसरावी. खरे तर इम्तियाज जलील हे राजीनामा देऊन आले, तर त्यांना घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी यावं. नक्कीच पवार साहेब त्यांना राष्ट्रवादीत घेतील, असे आवाहन भुजबळ यांनी केले.
पालकमंत्री छगन भुजबळ आज निफाड तालुक्यातील लासलगाव येथे एका कार्यक्रम प्रसंगी आले होते. यावेळी भुजबळ म्हणाले की “महाविकास आघाडीची सत्ता ही पाच वर्षे टिकणार असून पुढेही आम्ही एकत्र लढल्यास भाजपने महाराष्ट्राची सत्ता विसरावी. इम्तियाझ जलील हे एमआयएम चा राजीनामा देऊन आले तर त्यांना पक्षात घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी राष्ट्रवादीच्या धोरणाप्रमाणे काम करावं नक्कीच पवार साहेब त्यांना राष्ट्रवादी घेतील असे भुजबळ यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे, अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सोनिया गांधी पवार साहेब यांचे महाविकास आघाडीचे सरकार निश्चितपणे पाच वर्षे टिकणारे असून पाच वर्षानंतर हे तीन पक्ष एकत्रित लढले तर भाजपने महाराष्ट्रातील सत्ता विसरला हरकत नाही. असे भुजबळ म्हणाले. NCP’s invitation to MP Imtiaz Jalil
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महाविकास आघाडीतील २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही आमदार नाराज आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर भुजबळ म्हणाले की, “उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सोनिया गांधी यांच्या आघाडीचे सरकार निश्चितपणे पाच वर्षे टिकणार आहे.
पाच वर्षानंतर हे तीन पक्ष एकत्रित लढले तर भाजपाने महाराष्ट्रातील सत्ता विसरायला हरकत नाही,” असा टोला भुजबळांनी लगावला. तर, “इम्तियाज जलील एमआयएमचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत आले, तर त्यांना पक्षात घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी राष्ट्रवादीच्या धोरणाप्रमाणे काम करावं, नक्कीच पवार साहेब त्यांना राष्ट्रवादीत घेतील,” असे भुजबळ म्हणाले.
महाविकासआघाडी सोबत घेण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिला. यावर भुजबळ म्हणाले. ‘एमआयएमचा राजीनामा देऊन आले तर त्यांना घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी राष्ट्रवादीच्या धोरणाप्रमाणे काम करावे नक्कीच शरद पवार त्यांना राष्ट्रवादी घेतील’ असे भुजबळ म्हणाले.