□ वडापूरच्या पाटील कुटुंबियांनी समाजासमोर ठेवला आदर्श
सोलापूर : चांगले असो की वाईट कशाचीही पर्वा न करता प्रत्येकजण डोळेझाक करीत पारंपारिक कर्म कांडाला प्राधान्य देत तो निमूटपणे करत असतो. मात्र सोलापुरात याला छेद देत वडापूरच्या पाटील कुटुंबियांनी समाजासमोर ठेवला आदर्श ठेवलाय . वाचा सविस्तर…
आपल्या जवळच्या नात्यातील व्यक्तींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अस्थी किंवा रक्षा विसर्जन करताना आपण अतिशय संवेदनशील असतो. प्रिय जणांच्या अस्थी विसर्जीत करताना शक्यतो नदीपात्रात अथवा वाहत्या पाण्यात करतो. हे करण्यामागे आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजणांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी हा सारा प्रपंच असतो. मात्र याला अपवाद ठरला आहे, ते वडापूर (ता.द.सोलापूर) या गावातील पाटील परिवार.
पाटील परिवारातील सदस्य मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी आपले वडील धोंडिबा नामदेव पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी आपल्या सर्व बंधू व भगिनींना विश्वासात घेत पारंपारिक कर्म कांडाला फाटा देऊन कोणतेही विधी न करता राष्ट्रमाता जिजाऊ वंदनेने भडाग्नी दिला. Planting of trees in Solapur breaking traditional rituals, avoiding bone immersion in river
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
इतक्यावरच न थांबता तिसर्या दिवशी अस्थी किंवा रक्षा नदीपात्रातील पाण्यात न टाकता त्याच जागेवर पाच विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यामुळे पाटील परिवाराचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
आपल्या वृध्द वडिलांच्या अस्थी व रक्षा पाण्यात सोडण्याऐवजी त्या वृक्षारोपणासाठी वापरल्या आहेत. त्यातून पुढील काही वर्षात मोठी झाडे तयार होऊन नव्या पिढीला सावली आणि फळे मिळतील आणि वडिलांची आठवणही पुढील पिढीला कायम होत राहील, हीच भावना यामागे पाटील परिवाराची आहे.
कोणत्याही अनिष्ट चालीरीती, रूढी-परंपर न मानता वृद्धापकाळाने निधन झालेल्या वडिलांवर पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार करून पाटील परिवाराने इतर समाजाकडे आदर्श ठेवला आहे. नदीमध्ये रक्षाविसर्जन करून नदी अस्वच्छ करण्यापेक्षा रक्षा शेतीत पसरविली तर शेतीच्या फायद्याची आहे हाच आदर्श ठेवून पाटील परिवाराने वृक्षारोपणाचा निर्णय घेतला.
》एप्रिलपासून 800 हून अधिक औषधे महागणार
अत्यावश्यक औषधांच्या यादीत येणाऱ्या सुमारे 800 औषधांच्या किमती येत्या एप्रिलपासून 10.7 टक्क्यांनी वाढणार आहेत. किमती वाढल्याचा परिणाम ताप, संक्रमण, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचारोग आणि रक्तक्षय यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतींवर होणार आहे. घाऊक दर निर्देशांकात झालेल्या तीव्र वाढीमुळे हे घडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.