नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. काही असामाजिक तत्वांनी केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि प्रचंड तोडफोड केली, असे सिसोदिया यांनी सांगितले आहे. या हल्ल्यासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरले आहे.
हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरिअर तोडले आहेत. तसेच घराच्या गेटवरील बूम बॅरिअरही तोडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विरोध भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते करत होते. या निदर्शनात तेजस्वी सूर्या, चहल, वैभव सिंग यांच्यासह दिल्ली प्रदेश युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची खिल्ली उडवली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
दरम्यान हा हल्ला भाजपच्या गुंडांनीच केल्याचा आरोप आम आदमी पार्टी आणि सिसोदिया यांनी म्हटलं आहे. मात्र, आपच्या या आरोपावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.
मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून या हल्ल्याचं संपूर्ण खापर भाजपवर फोडलं आहे. भाजपच्या गुंडांनी केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली आहे. भाजपच्या पोलिसांनी या गुंडांना रोखण्याऐवजी केजरीवालांच्या घरापर्यंत त्यांना घेऊन गेली, असा आरोपही सिसोदिया यांनी केला आहे.
Attack on Chief Minister Arvind Kejriwal’s house
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावेळी भाजप युवा मोर्चाची निदर्शने सुरू होती. त्यावेळी आंदोलकांनी गोंधळ घातला. सीसीटीव्हीवरही हल्ला केला. मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर रंग फेकला. या प्रकरणी आम्ही 50 लोकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर जमलेला जमाव पांगवण्यात आला असून आता या परिसरात शांतता असल्याचं दिल्ली नॉर्थ डीसीपींनी सांगितलं.
दरम्यान, केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाला नंतर आपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. केजरीवाल सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. हे पहिल्यांदाच होत नाही. जेव्हा जेव्हा भाजप निरुत्तर होते, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून असे हल्ले होतात. हा लोकशाहीला धोका आहे. दिल्ली पोलीस आणि गृहमंत्रालयाने त्याविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणी राय यांनी केली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा भिंती तोडल्या आहेत. याशिवाय गेटवरील बूम बॅरिअर्सही तुटले आहेत. भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली, असा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे. एवढेच नाही तर भाजप पोलिसांनी त्यांना थांबवण्याऐवजी दारात आणले, असेही ते म्हणाले.
50 कामगार ताब्यात असताना, दिल्ली उत्तर डीसीपीने सांगितले की भाजप युवा मोर्चाचा निषेध सुरू होता, ज्यामध्ये आंदोलकांनी गोंधळ घातला, सीसीटीव्हीवरही हल्ला केला, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पेंट फेकले. यांच्यावर कारवाई करून आम्ही 50 जणांना ताब्यात घेतले आहे. या ठीकाणी गर्दी झाली होती ती आता पूर्ण शांत झाल्याचे सांगितले.