Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

नवनीत राणांना तुरुंगात हीन वागणूक, दलित असल्याची करून दिली जातीय जाणीव

Surajya Digital by Surajya Digital
April 25, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
नवनीत राणांना तुरुंगात हीन वागणूक, दलित असल्याची करून दिली जातीय जाणीव
0
SHARES
61
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ भोंग्याच्या वाद, बैठकीसाठी फडणवीस, राज ठाकरे गैरहजर

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘नवनीत राणांना जेलमध्ये अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली. पिण्याचे पाणी दिले जात नाही, वॉशरूमला जाऊ दिले जात नाही. तसेच एक महिला हनुमान चालिसा म्हणते म्हणून 124-अ अंतर्गत तुरुंगात टाकलं जात असेल आणि दलित असल्याची जाणीव करून दिली जात असेल, तर या महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपलेलं आहे, असंही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांवर सातत्यानं हल्ले सुरू आहेत. त्यावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. हनुमान चालीसा म्हणण्यास विरोध कशाला? आम्ही कुठंही हनुमान चालीसा म्हणू शकतो असं म्हणत फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली. त्यानंतर पत्रकार परिषदेला उपस्थित भाजपा नेत्यांनी टाळ्या वाजवून फडणवीसांना प्रतिसाद दिला. हनुमान चालिसा पठणानं राजद्रोह होत असेल, तर आम्ही दररोज राजद्रोह करण्यास तयार आहे. सरकारनं केसेस दाखल करून घ्याव्यात, असं आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलं.

 

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावरून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला ३ मेपर्यंची मुदत दिली आहे. त्यामुळे वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजप नेते अनुपस्थित होते. त्याबद्दल फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. गेल्या ४-५ दिवसांत घडलेल्या घटना, भाजप नेत्यांवरील हल्ले पाहता सरकारनं संवादासाठी जागा ठेवली आहे, असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला गेलो नाही, असं फडणवीस म्हणाले. गृहमंत्र्यांनी महत्त्वाच्या विषयावर बैठक बोलावली. पण त्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच उपस्थित नव्हते. मग ती बैठक केवळ टाईमपाससाठी होती का?, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

 

विरोधकांना जिवानिशी संपवायचं, हीच प्रवृत्ती असेल तर आम्ही संघर्ष करू. किरीट सोमय्यांना केंद्राची झेड दर्जाची सुरक्षा आहे. पण पोलिसांसमोर त्यांच्यावर हल्ला झाला. मोहित कंबोज यांचं मॉब लिन्चिंग करण्याचा प्रयत्न झाला. एफआयआर नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पोलखोल सभा, रथांवर हल्ले झाले. मात्र कितीही हल्ले झाले तरीही आम्ही गप्प बसणार नाही. भ्रष्टाचाराविरोधातील आमची लढाई सुरूच राहील, असं म्हणत फडणवीसांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

Navneet Rana was treated badly in jail and made to be a Dalit

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

महाराष्ट्रात भोंगा वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी आत्तापर्यंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री अस्लम शेख, अनिल परब, उदय सामंत यांच्यासह वारीस पठाण, रईस शेख पोहोचले आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर, इम्तियाज जलील, राज ठाकरे हे गैरहजर होते.

नवनीत राणा यांना भायखळ्यातील कोठडीत ठेवण्यात आलं. शनिवार आणि रविवारची रात्र कोठडीत घालवलेल्या नवनीत राणा यांना कस्टडीत हीन वागणूक देण्यात आली, असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला. आता या सगळ्याबाबत त्यांनी त्यांच्या वकिलांमार्फत लोकसभेच्या सभापतींकडे तक्रार केली असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

 

नवरात्रात रात्रभर भजन, गर्बा व्हायचा, गणपतीचे कार्यक्रम रात्रीही व्हायचे, ज्या दिवशी सरकारने सांगितलं. 10 नंतर माईक नाही, त्यानंतर आम्ही ते बंद केलं, 12 दिवस जी सूट मिळते, त्यातच आम्ही 12 वाजेपर्यंत ते वाजवतो, असं फडणवीस म्हणालेत.
जर सुप्रीम कोर्टाचे आदेश हिंदू समाज मान्य करत असेल, तर तो आदेश इतर समाजांनीही मान्य केलाच पाहिजे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन झालंच पाहिजे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचंही देवेंद्र फडणवीसांना एक प्रकारे समर्थन केलंय.

 

● देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले…

– भोंग्याबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीवर भाजपकडून बहिष्कार.

– सरकारकडून पोलिसांचा दुरूपयोग केला जातोय, मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरून सगळं सुरू.

– सरकारला जशात तसं उत्तर देण्याची ताकद भाजपमध्ये आहे. या सरकारने महाराष्ट्राचं पुरोगामीत्व संपवलं.

– हनुमान चालिसा भारतात नाही म्हणणार तर काय पाकिस्तानात म्हणायची का? नवनीत राणांना वाईट प्रकारची वागणूक देण्यात आली.

Tags: #नवनीतराणा #तुरुंगात #हीन #वागणूक #दलित #जातीय #जाणीव
Previous Post

सोलापुरातील वाढत्या ऊस उत्पादनावरुन नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Next Post

सोलापुरात इनोव्हाकार आणि ट्रकचा भीषण अपघात, पाच ठार तर चार जखमी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापुरात इनोव्हाकार आणि ट्रकचा भीषण अपघात, पाच ठार तर चार जखमी

सोलापुरात इनोव्हाकार आणि ट्रकचा भीषण अपघात, पाच ठार तर चार जखमी

वार्ता संग्रह

April 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Mar   May »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697