Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

बच्चू कडू म्हणाले, डोक्यावरून पाणी गेलंय, समर्थन ५० आमदारांपर्यंत पोहोचेल

महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीच्या दिशेने

Surajya Digital by Surajya Digital
June 22, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
बच्चू कडू म्हणाले, डोक्यावरून पाणी गेलंय, समर्थन ५० आमदारांपर्यंत पोहोचेल
0
SHARES
195
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

● महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीच्या दिशेने

मुंबई : शिवसेनेतून एक मोठा गट फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणार मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार आज पहाटेच सूरतहून गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. सूरतमधील हॉटेलमधून निघण्याआधी बंडखोर आमदारांचा एक ग्रूप फोटो समोर आला आणि यात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. Bachchu Kadu said, “Water is gone from the head, support will reach 50 MLAs. Dismiss the government.”

 

गुवाहाटीला पोहोचल्यानंतर बच्चू कडू यांनी संपूर्ण घटनाक्रम वृत्तवाहिनीला फोनवरुन सांगितला आहे. यात बच्चू कडू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत फोनवरुन बोलणं झाल्याचं म्हटलं.

 

“मी स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यांच्याशी बोलणं झालं. मी दोन्ही निवडणुकीला म्हणजेच राज्यसभा आणि विधान परिषदेलाही तुम्हाला मतदान केलं. पण अचानक हे वातावरण तयार झालं आणि मी आज इथं आहे असं त्यांना सांगितलं. एवढा सगळा प्रकार झाल्यामुळे मुख्यमंत्री नाराज होतेच. त्यांनी तुम्ही परत या असं आवाहन केलं. पण तोवर सगळं पाणी डोक्यावरुन गेलं आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

 

आमदारांना मारहाण करुन डांबून ठेवण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता बच्चू कडू यांनी इथं असं अजिबात काहीच झालेलं नाही असं म्हटलं. “सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस – राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

एकनाथ शिंदे यांच्या गटाला असलेलं समर्थन हे ५० आमदारांपर्यंत पोहोचेल असा दावा देखील बच्चू कडू यांनी केला. गुवाहाटीमध्ये सध्या शिवसेनेचे ३३ आमदार आणि अपक्ष ३ असे ३६ आमदार आहेत. यात शिवसेनेचे आणखी काही आमदार येणार आहेत. तसंच काँग्रेसचेही आमदार संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काळात हे समर्थन ५० आमदारांपर्यंत पोहोचेल, असं बच्चू कडू म्हणाले.

□ महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीच्या दिशेने

 

एकनाथ शिंदेच्या बंडामुळे शिवसेनेचे सरकार अल्पमतात आले आहे त्यात एकनाथ शिंदे आणि • नाराज आमदार आसाममध्ये जाऊन बसल्याने ते आता नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत त्यामुळे शिवसेनेची उरलीसुरली आशाही धुळीस मिळाली आहे त्यात जाणार यावर शिक्का मारला आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकिय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने चालला आहे असे व्टिट करत पुढे संजय राऊत यांच्या ट्विटने आता शिवसेनेचे सरकार काय घडणार हेच सांगितले आहे.

 

□ आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्रीचा उल्लेख हटवला

 

एकनाथ शिंदेचे बंडामुळे शिवसेनेचे सरकार जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून संध्याकाळपर्यंत ठाकरे मुख्यमंत्री असतील का नाही यावर शिक्कामोर्तब होण्याआधीच आदित्य ठाकरेंनी आपल्या व्टिटर प्रोफाईलमधून पर्यावरण मंत्री हा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे तापलेल्या राजकीय वातावरणात मविआ सरकारचे आता काही खरे नाही असे चित्र स्पष्ट होत आहे.

 

□ एकनाथ शिंदे सत्ता स्थापनेसाठी दुपारी मुंबईत येण्याची शक्यता

एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत उतरताच 40 आमदारांचा गट स्थापला असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. आज दुपापर्यंत एकनाथ शिंदे मुंबईत येण्याची शक्यता बोलली जात आहे. एकनाथ शिंदे स्पेशल विमानाने मुंबईला येऊन राज्यपालाची भेट घेऊ शकतात. तसेच ते आपल्याच गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याची विनंती करणार जर त्यांची विनंती मान्य झाली तर एकनाथ शिंदे भाजपासोबत सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात.

 

Tags: #BachchuKadu #said #Water #gone #head #support #reach #50MLAs #Dismiss #government#बच्चूकडू #राजकारण #डोक्यावरून #पाणी #समर्थन #५०आमदारांपर्यंत #पोहोचेल #बरखास्त
Previous Post

राजकीय भूकंप; ‘या’ व्यक्तीचा मोठा हात, सर्व आमदारांकडून फोन काढून घेतले

Next Post

शिवसेनेतील बंड… ठाकरे यांना सत्तेचा मोह आवरला नाही (ब्लॉग)

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
शिवसेनेतील बंड… ठाकरे यांना सत्तेचा मोह आवरला नाही (ब्लॉग)

शिवसेनेतील बंड... ठाकरे यांना सत्तेचा मोह आवरला नाही (ब्लॉग)

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697